शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

कब्रस्तानसाठी नव्हे तर भाजपा मंदिरांसाठी खर्च करतेय जनतेचा पैसा - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 09:43 IST

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही केली.

अयोध्या : भाजपा सरकार लोकांचा पैसा कब्रस्तानसाठी जागा खरेदीवर खर्च करत नाही, तर मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि सुशोभीकरणावर खर्च करत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील आधीच्या सरकारांवर निशाणा साधला. तसेच, उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राम कथा पार्क येथे पोहोचलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही यावेळी केली.

कोविड-19 महामारीच्या वेळी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत होती, परंतु सरकारने ती पुढील वर्षी होळीपर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महामारी अजून संपलेली नाही, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. दरम्यान, या योजनेंतर्गत लोकांना गहू, तांदळासह मीठ, साखर, डाळी आणि तेल मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील 15 कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 661 कोटी रुपये खर्चाच्या 50 विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत.

'2023 पर्यंत तयार होईल राम मंदिर'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू असून ते 2023 पर्यंत तयार होईल. यासोबतच केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील 500 मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करत आहे. यातील 300 हून अधिक ठिकाणांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित ठिकाणांचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.

'31 वर्षांपूर्वी कारसेवकांवर गोळीबार'मागील सरकारांवर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले म्हणाले, "तुम्हाला आठवत असेल की 31 वर्षांपूर्वी 30 ऑक्टोबर 1990 आणि 2 नोव्हेंबर 1990 रोजी या अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार झाला होता. त्यावेळी 'जय श्री राम' ची घोषणा देणे आणि मंदिरासाठी आवाज उठवणे हा गुन्हा मानला जात होता, पण लोकशाहीची ताकद किती मजबूत असते, याची जाणीव तुम्ही करून दिली. जे 31 वर्षांपूर्वी रामभक्तांवर गोळीबार करत होते, ते या लोकशाहीच्या बळावर आज तुमच्यासमोर नतमस्तक झाले आहेत. अजून काही वर्षे असेच चालत राहिलो तर पुढच्या कार सेवेसाठी त्या लोकांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असलेले दिसेल. जेव्हा पुढची कारसेवा होईल, तेव्हा गोळी चालणार नाही, तर रामभक्तांवर कृष्णभक्तांवर फुलांचा वर्षाव होईल, ही लोकशाहीची ताकद आहे."

अखिलेश यादव यांच्यावर आनंद स्वरुप शुक्ला यांचा निशाणादुसरीकडे, उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. यादव यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून संरक्षण मिळत असून त्यातून त्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून अखिलेश जिनांचा गौरव करत असल्याचा दावा शुक्ला यांनी केला. दरम्यान, रविवारी सरदार पटेल यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त हरदोई येथील एका जाहीर सभेत अखिलेश यादव यांनी कथितरित्या म्हटले होते की, "सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना यांनी एकाच संस्थेत शिक्षण घेतले आणि बॅरिस्टर झाले. तसेच, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली आणि संघर्षातून कधीही मागे हटले नाही."

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाRam Mandirराम मंदिर