शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:59 IST

बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आलेला देशद्रोहाचा कायदा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नरेंद्र मोदी सरकारने भारतीय दंड संहिता(आयपीसी) कायद्यातंर्गत देशद्रोहाचा कायदा रद्द करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यसभेत सरकारने स्पष्ट केलं की, देशद्रोही, दहशतवादी आणि फुटिरतावादी यांच्याशी लढण्यासाठी देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसकडून देशद्रोहाचा कायदा रद्द करु असं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं त्यावरुन अनेकांनी काँग्रेसवर टीका केली होती. 

बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्टपणे नकार देत देशद्रोहाची जोडलेला कोणताही कायदा रद्द करण्याची शासनाची मानसिकता नाही. देशाविरोधी ताकदीसोबत लढण्यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे असं सांगितले. 1860 साली ब्रिटिश सरकारच्या राजवटीत हा कायदा बनविण्यात आला होता. 

भारतीय संविधान कायदा(आयपीसी) कलम 124 अ मध्ये देशद्रोहाची व्याख्या स्पष्ट करताना सांगण्यात आलं आहे की, जर कोणताही व्यक्ती सरकारविरोधात लिहित असेल, बोलत असेल अथवा समर्थन करत असेल किंवा राष्ट्रीय चिन्हांचा अपमान करुन संविधानाला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो. तसेच या गुन्हेगारास आजीवन कारावास अथवा तीन वर्षाची कैद होऊ शकते. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसच्या या घोषणेचा निषेध भाजपाने केला तसेच प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात भाजपाने हा मुद्दा उचलून धरला. निवडणूक प्रचारात भाजपाने आश्वासन दिलं होतं की जर देशात एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशद्रोहाचा कायदा कायम ठेवणार इतकचं नाही तर हा कायदा इतका कठोर बनविणार ज्यामुळे देशद्रोह करण्याचा विचारदेखील कोणीही करु शकणार नाही.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस