शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:59 IST

बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आलेला देशद्रोहाचा कायदा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नरेंद्र मोदी सरकारने भारतीय दंड संहिता(आयपीसी) कायद्यातंर्गत देशद्रोहाचा कायदा रद्द करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यसभेत सरकारने स्पष्ट केलं की, देशद्रोही, दहशतवादी आणि फुटिरतावादी यांच्याशी लढण्यासाठी देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसकडून देशद्रोहाचा कायदा रद्द करु असं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं त्यावरुन अनेकांनी काँग्रेसवर टीका केली होती. 

बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्टपणे नकार देत देशद्रोहाची जोडलेला कोणताही कायदा रद्द करण्याची शासनाची मानसिकता नाही. देशाविरोधी ताकदीसोबत लढण्यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे असं सांगितले. 1860 साली ब्रिटिश सरकारच्या राजवटीत हा कायदा बनविण्यात आला होता. 

भारतीय संविधान कायदा(आयपीसी) कलम 124 अ मध्ये देशद्रोहाची व्याख्या स्पष्ट करताना सांगण्यात आलं आहे की, जर कोणताही व्यक्ती सरकारविरोधात लिहित असेल, बोलत असेल अथवा समर्थन करत असेल किंवा राष्ट्रीय चिन्हांचा अपमान करुन संविधानाला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो. तसेच या गुन्हेगारास आजीवन कारावास अथवा तीन वर्षाची कैद होऊ शकते. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसच्या या घोषणेचा निषेध भाजपाने केला तसेच प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात भाजपाने हा मुद्दा उचलून धरला. निवडणूक प्रचारात भाजपाने आश्वासन दिलं होतं की जर देशात एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशद्रोहाचा कायदा कायम ठेवणार इतकचं नाही तर हा कायदा इतका कठोर बनविणार ज्यामुळे देशद्रोह करण्याचा विचारदेखील कोणीही करु शकणार नाही.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस