शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nirmala Sitharaman: नव्या नोटा छापून देशावरील संकट दूर करणार मोदी सरकार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:01 IST

print more currency to solve economic slowdown: अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला अनेक अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारला दिला आहे.

देशात खासकरून गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचे (Corona Financial Crisis) ढग गडद होत गेले आहेत. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून तांत्रिक दृष्ट्या मंदीच्या फेऱ्यात देश अडकला आहे. यंदा त्यात थोडीफार सुधारणा होताना दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी लोकसभेत (Loksabha) यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. (The government does not plan to print more currency to tide over the economic slowdown brought about by the COVID-19 pandemic)

केंद्र सरकार नवीन नोटा छापून आर्थिक संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  'जी नहीं श्रीमान!' असे उत्तर दिले आहे. आर्थिक संकटापासून वाचण्यासाठी नवीन नोटा छापण्याचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी संसदेत केला आहे. 

अनेक अर्थतज्ज्ञांनी  सरकारला सल्ला दिला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला आहे. लोकसभेत अर्थमंत्र्यांनी एका प्रश्नावर लिखीत उत्तर दिले आहे. यामध्ये जीडीपीमध्ये 2020-21 मध्ये 7.3 टक्के एवढी घट होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. 

जीडीपीच्या घसरणीवरून हे समजतेय की कोरोना महामारीचा परिणाम किती खोलवर झाला आहे आणि आम्ही त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलली आहेत. अर्थव्य़वस्थेचा पाया भक्कम आहे. लॉकडाऊन हळू-हळू हटविणे आणि आत्मनिर्भर भारत मिशनसारख्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे दुसऱ्या सहामाहीत सुधारणा दिसत आहे, असे त्या म्हणाल्या.

सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे 29.87  लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडता येईल, आर्थिक नुकसान भरून निघेल आणि रोजगार वाढतील हा उद्देश होता. असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMONEYपैसाlok sabhaलोकसभा