शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:43 IST

अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले आहेत. या दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. त्यांनी रशिया आणि फ्रान्समधील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे.

उत्तरासाठी भारत तयार : अजित डोवाल

अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची आणि संघर्ष रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. अजित डोवाल यांनी म्हटले की, 'तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु, जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर, भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.' भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आणि 'नॉन-एस्कलेटेबल' उपाययोजनांबद्दल विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी हे विधान केले. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांच्या बालेकिल्ल्यांचा समावेश आहे.

भारतासोबतचा तणाव संपवण्यास तयार : ख्वाजा आसिफ

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, भारताने आक्रमक भूमिका सोडली तरच हा तणाव संपू शकेल. त्यांच्या विधानानंतर, पाकिस्तानी लष्कराने शाहबाज शरीफ यांच्याकडे भारताच्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी परवानगी मागितली. यावर शाहबाज म्हणाले की, त्यांनी त्यांच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक