शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:24 IST

मोदींच्या भाषणावर काँग्रेसची जोरदार टीका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण अतिशय उथळ होतं. त्यात काहीही नवं नव्हतं, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात अच्छे दिन आले नाहीत, आता जनतेला सच्चे दिन हवे आहेत, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण अतिशय उथळ होतं. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नव्हतं, असं सुरजेवाला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मोदींच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरण असो वा व्यापम घोटाळा किंवा छत्तीसगडमधील पीएएस घोटाळा, मोदी एकाही विषयावर बोलले नाहीत,' असं सुरजेवाला 'यांनी म्हटलं. डोकलाममधील चीनच्या घुसखोरीबद्दलदेखील मोदी मूग गिळून गप्प बसतात. देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घटना घडत असतानाही मोदी गप्पच राहतात,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर तोफ डागली. 

पंतप्रधानांनी त्यांच्या लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणात तरी खरं बोलायला हवं होतं, असा चिमटादेखील सुरजेवाला यांनी काढला. 'मोदींच्या संपूर्ण भाषणात काहीच तथ्य नव्हतं. लाल किल्ल्यावरील अखेरच्या भाषणात तरी मोदींनी खरं बोलायला हवं होतं. मोदी मन की बात करु शकत नाहीत. त्यांनी किमान काम की बात करायला हवी होती,' असं सुरजेवाला यांनी म्हटलं. देशवासीयांनी अच्छे दिनची वाट पाहणं केव्हाच सोडून दिलं आहे. आता जनतेला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRed Fortलाल किल्लाIndependence Dayस्वातंत्र्य दिवसcongressकाँग्रेस