शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:37 IST

रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला.

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता या दोन्ही देशातील DGMO (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स) यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूने एकही गोळी चालवली जाणार नाही अथवा एकमेकांविरोधात कुठलेही आक्रमक अथवा शत्रुतापूर्ण कारवाई होणार नाही यावर सहमती झाली. त्याशिवाय दोन्ही देशांनी सीमेवरील सैनिकांची संख्या कमी करण्याबाबत तात्काळ उपायांवर विचार करतील यावरही चर्चा करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता होणारी ही चर्चा काही कारणास्तव संध्याकाळी ५ वाजता झाली.

९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त 

भारताने ६ मे च्या मध्यरात्री १ च्या सुमारास ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. ज्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला. शनिवारी १० मे रोजी दोन्ही देशांकडून युद्धविराम करण्याची घोषणा करण्यात आली.

३५-४० पाकिस्तानी सैन्य मारले

सोमवारच्या सैन्य पत्रकार परिषदेत लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी लढाईत पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मारले गेले. आम्ही अचूक हल्ले केले. भारताने पाकिस्तानातील सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणाही उद्ध्वस्त केली. आवश्यकता भासल्यास भारतीय सैन्य कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे असं सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, शनिवारी युद्धविराम झाल्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यावरही भारतीय सैन्याने माध्यमांना उत्तर दिले. रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला. जर यापुढे पुन्हा असं घडले तर भारत चोख प्रत्युत्तर देईल. आतापर्यंत आम्ही खूप संयम राखला आहे. आमची कारवाई केंद्रीत आहे. जर आमच्या नागरिकांच्या जीवाला, देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला कुठलाही धोका होणार असेल तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर