शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:37 IST

रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला.

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता या दोन्ही देशातील DGMO (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स) यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूने एकही गोळी चालवली जाणार नाही अथवा एकमेकांविरोधात कुठलेही आक्रमक अथवा शत्रुतापूर्ण कारवाई होणार नाही यावर सहमती झाली. त्याशिवाय दोन्ही देशांनी सीमेवरील सैनिकांची संख्या कमी करण्याबाबत तात्काळ उपायांवर विचार करतील यावरही चर्चा करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता होणारी ही चर्चा काही कारणास्तव संध्याकाळी ५ वाजता झाली.

९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त 

भारताने ६ मे च्या मध्यरात्री १ च्या सुमारास ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. ज्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला. शनिवारी १० मे रोजी दोन्ही देशांकडून युद्धविराम करण्याची घोषणा करण्यात आली.

३५-४० पाकिस्तानी सैन्य मारले

सोमवारच्या सैन्य पत्रकार परिषदेत लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी लढाईत पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मारले गेले. आम्ही अचूक हल्ले केले. भारताने पाकिस्तानातील सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणाही उद्ध्वस्त केली. आवश्यकता भासल्यास भारतीय सैन्य कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे असं सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, शनिवारी युद्धविराम झाल्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यावरही भारतीय सैन्याने माध्यमांना उत्तर दिले. रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला. जर यापुढे पुन्हा असं घडले तर भारत चोख प्रत्युत्तर देईल. आतापर्यंत आम्ही खूप संयम राखला आहे. आमची कारवाई केंद्रीत आहे. जर आमच्या नागरिकांच्या जीवाला, देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला कुठलाही धोका होणार असेल तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर