शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

No Confidence Motion: राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 17:57 IST

तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठरावाला विरोध करत आपल्या सरकारची बाजू मांडली.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या गळाभेटीवरुन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले आहे. तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठरावाला विरोध करत आपल्या सरकारची बाजू मांडली. आज भारतीय जनता पार्टी सर्वात बलवान पक्ष बनला असून आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठीही अनेक पक्षांना एकत्र प्रयत्न करावे लागले. कोणत्याही एका पक्षाकडे हा ठरावही सादर करण्याची ताकद नाही.

भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेस आणि विरोधी पक्षांची स्थिती सांगितली. एकेकाळी राजीव गांधी यांनी आमच्या पक्षाला हम दो हमारे दो अशा शब्दांमध्ये संबोधले होते. आमचे तेव्हा दोनच खासदार होते पण आज सर्व परिस्थिती बदलली, काळ बदलला. आज आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी काँग्रेसच काय कोणत्याही पक्षाला स्वबळावर उभे राहाता येत नाही. अनेक पक्षांना एकत्र येऊन आमच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणावा लागला. इतकी त्यांची स्थिती वाईट झाली, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्ष किती कमकुवत झाले आहेत हे सांगितले.

भारतीय जनता पार्टीला बदलत्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात सहकार्य आणि मते मिळत आहेत. केरळ असो वा त्रिपुरा सर्वत्र आमचे संख्याबळ वाढत गेले आहे. हे आमच्या वाढत्या यशाचे लक्षण आहे. पंधरा वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला गेला होता. मात्र नंतरच्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसप्रणित सरकाकडे संख्याबळ होते त्यामुळे आम्ही कधीही अविश्वासदर्शक ठराव आणला नव्हता, कारण डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे पुरेसे बहुमत होते हे आम्हाला माहिती होते. हा समजूतदारपणा विरोधी पक्षांनी दाखविण्याची गरज होती. आताही या आमच्या सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे तरिही अविश्वासदर्शक ठराव स्विकारून आम्ही सशक्त लोकशाहीच्यादृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसेतर  (एकाच) पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली यातून आमच्यावरील जनतेचा विश्वास दिसून येतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

भाजपाविरोधात काही पक्ष एकत्र येत आहेत. त्या पक्षांमध्ये आपसांतही एकी नाही. त्यांचे नेतृत्व कोण करेल हा प्रश्न आहेच. त्यांच्यामध्ये नेतृत्त्वाचा प्रश्न आला की  ''गई भैंस पानी में'' अशी स्थिती निर्माण होईल अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांची फिरकी घेतली. 2030मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. आज जीडीपीची गती जास्त असून चलनवाढीचा दर कमी झाला आहे. याचाच अर्थ भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदBJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंग