शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

No Confidence Motion: मोदींची मोठी खेळी, अविश्वास प्रस्तावाला होकार देण्यामागे वेगळंच राजकारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:11 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेमध्ये एनडीकडे 312 खासदारांचे बळ आहे. त्यामुळे मोदी सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याविषयी फारशी चिंता नाही. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात सरकारने केलेले काम आणि योजनांची माहिती देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याची आणि अनेक राजकीय मुद्द्यांवरून विरोधी पक्षांना घेरण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांवर हल्लाहोल करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या प्रभावी वक्त्यांना पुढे करणार आहे. अविश्वास प्रस्तावावर बोलणाऱ्या वक्त्यांची नावे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. मात्र फर्डे वक्ते म्हणून ओळखले जाणारे केंद्र सरकारमधील मंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि रविशंकर प्रसाद यांच्यावर विरोधकांचा सामना करण्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते. तसेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान दलितांच्या मुद्द्यावर सरकारची बाजू मांडतील तर अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल या मागास वर्गाची बाजू मांडण्याची शक्यता आहे. या अविश्वास प्रस्तावावरील अंतिम भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. या भाषणात मोदी तीन तलाक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्न तसेच सरकारच्या इतर योजनांबाबत उल्लेख करतील. तसेच काँग्रेस आणि विरोधकांच्या एकजुटीवरही मोदी आपल्या भाषणातून प्रहार करण्याची शक्यता आहे.  भाजपाने सभागृहातील आपल्या नेत्यांना सहकारी आणि समान विचारधारा असलेल्या पक्षांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. अविश्वास प्रस्तावादरम्यान, शिवसेना, टीआरएस, एआयएडीएमके हे पक्ष आपल्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भाजपाला आहे. तसेच 20 खासदार असलेला बीजू जनता दलही काँग्रेसपासून दूर राहण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याकडे अविश्वास प्रस्तावासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींना देशाचे समर्थन आहे. सभागृहात ठरावाचा सामना करायला सरकार तयार आहे. ठरावाचे आम्ही स्वागत करतो, तसेच एनडीए अविश्वास प्रस्तावाविरोधात एकजुटीने मतदान करील असा विश्वास भाजपा नेते अनंत कुमार यांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे आता सगळे विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करतात की सभागृहातून वॉकआऊट करतील हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस