शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:23 IST

जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे

नवी दिल्ली- केंद्रातील भाजपाप्रणित रालोआ सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वासठराव दाखल केला आहे. सुमारे 15 वर्षांनी लोकसभेत अविश्वास ठराव दाखल झाला आहे. आज मांडलेल्या अविश्वास ठरावासंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणं आवश्यक ठरेल.1) आज लोकसभेच्या 50 हून अधिक सदस्यांनी अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला आहे. नियमांनुसार लोकसभेच्या सभापतींना हा ठराव दहा दिवसांमध्ये चर्चेसाठी आणावा लागतो.2) या ठरावामुळे सत्ताधारी भाजपा नेतृत्त्वाखालील सरकारला कोणताही धोका नाही कारण केवळ भाजपाकडे 273 खासदार असून मित्रपक्षांचेही खासदार त्यांच्या मदतीसाठी आहेत.3) 2003 साली सोनिया गांधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र तो मंजूर करण्यात विरोधी पक्षांना अपयश आले.4) आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळावा यासाठी तेलगू देसम पार्टी गेले काही महिने प्रयत्न करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी तेलगू देसमने आपल्या मंत्र्यांनाही सरकारमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले. तेलगू देसमबरोबर वायएसआर काँग्रेसही आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. 5) तेलगू देसमने अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अविश्वास ठराव मांडला होता. मात्र तेलंगण राष्ट्र समिती आणि अण्णा द्रमुक यांच्या घोषणाबाजी व गदारोळामुळे सभागृहातील कामकाज व्यवस्थित चालत नव्हते, म्हणून तो प्रस्ताव स्विकारण्यात आला नाही.6) काँग्रेसने आपल्याला सभागृहात चर्चा हवी आहे अशी भूमिका मांडली आहे. जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी आणि गुंतवणुकीत झालेली घट अशा अनेक विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाने आपण या विषयांवर चर्चेसाठी नेहमीच तयार होतो असे प्रत्युत्तर काँग्रेसला दिले आहे.7) अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यंत कमी कामकाज झाले होते. गेल्या 18 वर्षांमध्ये अशी पहिल्यांदाच वेळ आली होती. नियोजित वेळेच्या केवळ 21 टक्के इतकेच काम करण्यात लोकसभेला यश आले तर राज्यसभेत केवळ 27 टक्के कामकाज झाले होते.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावLoksabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीcongressकाँग्रेस