शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नितीश कुमार मुख्यमंत्री होण्यास अनुत्सुक : जदयूच्या खराब कामगिरीमुळे नाराज; भाजप नेत्यांनी समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 15:37 IST

243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत. यात भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. 

ठळक मुद्दे243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत.भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. नितीश यांनी जनता आणि पंतप्रधानांचे मानले आभार.

पाटणा - बिहारमध्ये एनडीएला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या असतानाही, नितीश कुमारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. मात्र, भाजप नेत्यांनी नितीश कुमारांना समजावले असून सलग चौथ्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी राजी केले आहे. नितीश कुमार हे निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नाराज आहेत.  आपल्या इच्छेनुसार सरकार चालवा - भाजपाइंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 'नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे दर्शवल्यानंतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास राजी केले आहे. एवढेच नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकतील, असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश यांना दिले आहे.

नितीश यांनी जनता आणि पंतप्रधानांचे मानले आभार -नितीश कुमार बुधवारी एक ट्विट करून म्हणाले, 'जनता सर्वोपरी आहे. एनडीएला बहुमत दिल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही मी सातत्याने समर्थनासाठी आभार मानतो.'

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

चिरागनं बिघडवलं जदयूचं गणित -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवानांनी आणि त्यांच्या लोजपाने जदयू आणि नितीश कुमारांना चांगलेच काळजीत टाकले होते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, 'ते (नितीश कुमार) अत्यंत तणावात होते, की चिरागने किमात 25 ते 30 जागांवर जदयूच्या विजयाची शक्यता बिघडवली. आम्ही त्यांना मुख्यमंत्री राहण्यासाठी राजी केले आहे. मात्र, आता भाजप आघाडीतील मोठा भागिदार आहे.' 

243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत. यात भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. 

बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं?

2005 नंतरची सर्वात वाईट कामगिरी -  यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जदयूला 43 जागा मिळाल्या आहेत. 2005च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही पक्षाची सर्वात वाईट कामगिरी आहे. 2015च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 71 जागांवर विजय मिळवला होता.  

वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतली नितीश कुमारांची भेट-बिहारमधील वरिष्ठ भाजप प्रभारी भूपेंद्र यादव, बिहार भाजप अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी सायंकाळी नीतीश कुमार यांची भेट घेतली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा