शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब; नाराजीमुळे ते निघून आले, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:28 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे.

पटणा – बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत नाराज झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिथून लवकर निघून आले. नितीश कुमार यांना नव्या INDIA आघाडीचे संयोजक न बनवल्याने नाराज आहेत. त्यामुळेच ते बंगळुरूच्या बैठकीतून लवकर बाहेर पडले असा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच बंगळुरूत दोन दिवसीय विरोधी पक्षाच्या महाबैठकीचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले. १७-१८ जुलैला ही बैठक बंगळुरूत पार पडली. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही तर २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या या आघाडीला INDIA म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलेपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब

 बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात नितीश कुमार गायब होते. बैठकीतून निघून ते पटणासाठी रवाना झाले. नितीश कुमार नाराज होऊन बैठकीतून निघाले त्यामुळे पत्रकार परिषदेला थांबले नाहीत असा दावा भाजपाने केला आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी त्यांची मते मांडली.

भाजपा खासदार सुशील कुमार मोदी ट्विट करून म्हटलं की, नितीश आणि लालू प्रसाद यादव विरोधकांच्या पत्रकार परिषदेत न थांबता का निघून आले? INDIA चे संयोजक न बनवल्याने ते नाराज तर नाहीत ना...तर बिहारच्या महाआघाडीतील मोठे नेते बंगळुरूतून निघून आले असं केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ट्विटरमधून सांगितले. विरोधी पक्षाच्या बैठकीआधी बंगळुरूत नितीश कुमार यांच्याविरोधात पोस्टरबाजी झाली. त्यात बिहारमध्ये कोसळलेल्या ब्रीजचा उल्लेख होता. नितीश कुमार हे अनस्टेबल प्राइमिनिस्ट्रियल कंटेडर असल्याचे पोस्टरमध्ये लिहिलं.

दरम्यान, महाबैठकीत नेत्यांनी नितीश कुमार यांना बंगळुरू बोलावून त्याचा अपमान केला. काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात नितीश कुमार यांना अनस्टेबल म्हटलं गेले. ही काँग्रेसची नीती आहे. नितीश कुमार महाआघाडीत यावेत पण त्यांची महत्त्वाची भूमिका नको असं काँग्रेसला वाटते. यासाठी नितीश कुमार जबाबदार आहेत असं बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा