शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब; नाराजीमुळे ते निघून आले, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:28 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे.

पटणा – बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत नाराज झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिथून लवकर निघून आले. नितीश कुमार यांना नव्या INDIA आघाडीचे संयोजक न बनवल्याने नाराज आहेत. त्यामुळेच ते बंगळुरूच्या बैठकीतून लवकर बाहेर पडले असा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच बंगळुरूत दोन दिवसीय विरोधी पक्षाच्या महाबैठकीचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले. १७-१८ जुलैला ही बैठक बंगळुरूत पार पडली. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही तर २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या या आघाडीला INDIA म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलेपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब

 बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात नितीश कुमार गायब होते. बैठकीतून निघून ते पटणासाठी रवाना झाले. नितीश कुमार नाराज होऊन बैठकीतून निघाले त्यामुळे पत्रकार परिषदेला थांबले नाहीत असा दावा भाजपाने केला आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी त्यांची मते मांडली.

भाजपा खासदार सुशील कुमार मोदी ट्विट करून म्हटलं की, नितीश आणि लालू प्रसाद यादव विरोधकांच्या पत्रकार परिषदेत न थांबता का निघून आले? INDIA चे संयोजक न बनवल्याने ते नाराज तर नाहीत ना...तर बिहारच्या महाआघाडीतील मोठे नेते बंगळुरूतून निघून आले असं केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ट्विटरमधून सांगितले. विरोधी पक्षाच्या बैठकीआधी बंगळुरूत नितीश कुमार यांच्याविरोधात पोस्टरबाजी झाली. त्यात बिहारमध्ये कोसळलेल्या ब्रीजचा उल्लेख होता. नितीश कुमार हे अनस्टेबल प्राइमिनिस्ट्रियल कंटेडर असल्याचे पोस्टरमध्ये लिहिलं.

दरम्यान, महाबैठकीत नेत्यांनी नितीश कुमार यांना बंगळुरू बोलावून त्याचा अपमान केला. काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात नितीश कुमार यांना अनस्टेबल म्हटलं गेले. ही काँग्रेसची नीती आहे. नितीश कुमार महाआघाडीत यावेत पण त्यांची महत्त्वाची भूमिका नको असं काँग्रेसला वाटते. यासाठी नितीश कुमार जबाबदार आहेत असं बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी म्हटलं.

टॅग्स :congressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा