शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 08:23 IST

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खळबळजनक घडामोडीनंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या विचारात असल्याचे वृत्त पाटण्यातून येत आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. याचमुळे दुरावलेला भागीदार अकाली दलाला एनडीए आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यावर फेरविचार झाला असावा. भाजपने अकाली दलाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुखबीर सिंह बादल यांनाच त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्याऐवजी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने कर्नाटकात जनता दल (एस)बरोबर युती करण्याचे ठरवले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आता राज्यपाल म्हणून पाठवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. कारण त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत त्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात; परंतु विधानसभा निवडणुकीनंतरच. इतर पाच राज्यांसह नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी ते इच्छुक आहेत. विधानसभा जिंकल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना आंध्र प्रदेशात भाजप- टीडीपी युती रोखायची आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे १७ खटले आहेत.

  • सुखबीर सिंह बादल यांना कॅबिनेट पदाची ऑफर
  • अमरिंदर सिंह यांना राज्यपाल करणार?
  • जगन रेड्डी यांना आंध्रात हव्यात लवकर निवडणुका
  • हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये खळबळ
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी