शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

'नितीश कुमार आणि मोदींचे प्रेम 'लैला-मजनू'पेक्षा अधिक घट्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 12:26 IST

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे. ऑल इंडिया मजलिस ए -इत्तेहादुल मुस्लिम(एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये सभा घेताना नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार चढवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. बिहारच्या किशनगंज येथे निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हे विधान केलं आहे. 

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप प्रेम आहे. लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत असं त्यांचे प्रेम आहे. जेव्हा कधीही नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाबद्दल लिहिलं जाईल तेव्हा या दोघांतील लैला कोण? आणि मजनू कोण? हे मला विचारू नका, त्यांचा निर्णय तुम्ही करा असं ओवैसी यांनी सांगितले. 

बिहारमध्ये एकूण लोकसभेच्या 40 जागा आहेत ज्यामध्ये प्रत्येकी 17 जागा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल यूनाइटेड निवडणूक लढवत आहे. तर इतर 6 लोकसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टी निवडणूक लढवत आहे. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार या मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. किशनगंजमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. एमआयएमकडून याठिकाणी माजी आमदार अख्तरुल इमान यांचा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात 91 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. उर्वरित सहा टप्प्यातील मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणुकींचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच देशाची सत्ता कोणाच्या हातात जाते? भाजपा पुन्हा बहुमत मिळवणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला सापडतील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019kishanganj-pcकिशनगंज