शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

'नितीश कुमार आणि मोदींचे प्रेम 'लैला-मजनू'पेक्षा अधिक घट्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 12:26 IST

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे. ऑल इंडिया मजलिस ए -इत्तेहादुल मुस्लिम(एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये सभा घेताना नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार चढवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. बिहारच्या किशनगंज येथे निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हे विधान केलं आहे. 

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप प्रेम आहे. लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत असं त्यांचे प्रेम आहे. जेव्हा कधीही नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाबद्दल लिहिलं जाईल तेव्हा या दोघांतील लैला कोण? आणि मजनू कोण? हे मला विचारू नका, त्यांचा निर्णय तुम्ही करा असं ओवैसी यांनी सांगितले. 

बिहारमध्ये एकूण लोकसभेच्या 40 जागा आहेत ज्यामध्ये प्रत्येकी 17 जागा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल यूनाइटेड निवडणूक लढवत आहे. तर इतर 6 लोकसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टी निवडणूक लढवत आहे. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार या मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. किशनगंजमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. एमआयएमकडून याठिकाणी माजी आमदार अख्तरुल इमान यांचा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात 91 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. उर्वरित सहा टप्प्यातील मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणुकींचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच देशाची सत्ता कोणाच्या हातात जाते? भाजपा पुन्हा बहुमत मिळवणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला सापडतील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019kishanganj-pcकिशनगंज