शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार आणि मोदींचे प्रेम 'लैला-मजनू'पेक्षा अधिक घट्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 12:26 IST

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे. ऑल इंडिया मजलिस ए -इत्तेहादुल मुस्लिम(एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये सभा घेताना नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार चढवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. बिहारच्या किशनगंज येथे निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हे विधान केलं आहे. 

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप प्रेम आहे. लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत असं त्यांचे प्रेम आहे. जेव्हा कधीही नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाबद्दल लिहिलं जाईल तेव्हा या दोघांतील लैला कोण? आणि मजनू कोण? हे मला विचारू नका, त्यांचा निर्णय तुम्ही करा असं ओवैसी यांनी सांगितले. 

बिहारमध्ये एकूण लोकसभेच्या 40 जागा आहेत ज्यामध्ये प्रत्येकी 17 जागा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल यूनाइटेड निवडणूक लढवत आहे. तर इतर 6 लोकसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टी निवडणूक लढवत आहे. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार या मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. किशनगंजमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. एमआयएमकडून याठिकाणी माजी आमदार अख्तरुल इमान यांचा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात 91 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. उर्वरित सहा टप्प्यातील मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणुकींचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच देशाची सत्ता कोणाच्या हातात जाते? भाजपा पुन्हा बहुमत मिळवणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला सापडतील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019kishanganj-pcकिशनगंज