शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Nirmala Sitharaman : "राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 10:14 IST

Nirmala Sitharaman And Congress : निर्मला सीतारामन यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर खोटेपणा पसरवल्याचा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात खोटी विधानं केल्याचा गंभीर आरोप केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर खोटेपणा पसरवल्याचा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात खोटी विधानं केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तथ्य आणि आकडेवारीसह या खोट्याचा पर्दाफाश करण्यास सांगितलं आहे.

चंदिगड भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देताना भाजपा नेत्याने सांगितलं की, "गेल्या दहा निवडणुकांमध्ये काँग्रेस २५० जागांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरली आहे. असं असूनही त्यांच्यामध्ये एक खोटा आत्मविश्वास आहे."

"१३ राजकीय पक्षांची इंडिया आघाडी केवळ २३२ जागा जिंकू शकली, तर भाजपाला स्वबळावर २४० जागा जिंकल्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १४ राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही" असं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसवर खोटं पसरवल्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानांचा विपर्यास आणि खोटेपणा पसरवल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या जमिनीची भरपाई, अल्पकालीन लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षाने खोटे बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

"काँग्रेसची रणनीती आपण गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. खोटेपणा पसरवून आणि खोटी विधानं करून भाजपावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाने पसरवलेल्या प्रत्येक खोट्या विधानाला सोशल मीडियावर लगेचच तथ्य आणि आकडेवारीसह उत्तर दिले पाहिजे" असंही सीतारामन यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाcongressकाँग्रेस