शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:23 IST

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले... वाचा सविस्तर

Nirmala Sitaraman, Maharashtra CM : महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निरीक्षकाचे काम विधीमंडळ पक्षाची बैठक घेणे आणि नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करणे हे असते. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात निरीक्षकांचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले, हे सविस्तर जाणून घेऊया.

३ पैकी २ वेळा जुन्या चेहऱ्यालाच पसंती

निर्मला सीतारामन यांची गेल्या ७ वर्षात चौथ्यांदा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सीतारामन यांची यापूर्वी २०१७ मध्ये हिमाचल प्रदेश, २०१९ मध्ये हरयाणा आणि २०२२ मध्ये मणिपूरसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड झाली होती. २०१७ मध्ये हिमाचल निवडणुकीनंतर जयराम ठाकूर यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी जेपी नड्डा आणि प्रेम धुमल हे मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार होते. पण त्यावेळी जयराम यांचे मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव 'सरप्राईज' होते. २०१९ मध्ये निर्मला हरयाणात निरीक्षक म्हणून गेल्या. येथील विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जुने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तर २०२२ मध्ये निर्मला यांनी एन वीरेन सिंग या जुन्याच नावावर शिक्कामोर्तब केले.

मुख्यमंत्री निवडीसाठी निर्मला कोणता फॉर्म्युला वापरणार, याची आता चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र निवडणूक निकालानंतर ११ दिवसांनी निर्मला सीतारामन मुख्यमंत्री निवडण्यासाठी मुंबईला येत आहेत. निर्मला यांच्यासोबत विजय रुपाणी यांचीही नियुक्ती केली आहे. रुपाणी यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री भाजपकडूनच केले जात आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा होणार भाजपाचा मुख्यमंत्री

२०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपाने महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बनवला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण ते विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत. त्यानंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती