शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आजचा दिवस शेतकरी अन् प्रवासी मजुरांचा; 'या' आहेत आर्थिक पॅकेजमधील महत्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 18:32 IST

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. ...

ठळक मुद्देसरकारकडून शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणापीक कर्जाच्या परताव्याची तारीख 1 मार्च होती, ती वाढून 31 मे 2020 करण्यात आली आहे.राज्यांनी शेतकऱ्यांना 6700 कोटी रुपयांची मदत दिली आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी, स्थलांतरित मजूर, शेतकरी आणि गरीब लोक आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत. संकटाच्या काळात आम्ही सर्वप्रथम त्यांच्याच खात्यातच मदत पोहोचवली. देशात निश्चितपणे लॉकडाउन आहे. मात्र, सरकार सातत्याने रात्रंदिवस काम करत आहे, असे सीतारमण म्हणाल्या. त्या आर्थिक पॅकेजसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

या आहेत आजच्या मोठ्या घोषणा : 

  • शहरात राहणारे गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 11 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच, स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची आणि अन्न-पाण्याची योग्य व्यवस्था करावी, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

  • 8 कोटी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यापर्यंत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य. तसेच प्रत्येक कुटुंबाला एक किलो चना दाळ दिली जाणार आहे. यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • 23 राज्यांतील 67 कोटी लोकांना ‘एक राष्ट्र, एक राशन कार्ड’ योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे.
  • शहरात राहणाऱ्या गरिबांसाठी 15 मार्चपासून आतापर्यंत 7,200 नवे सेल्फ हेल्प ग्रुप (SHGs) तयार करण्यात आले आहेत.
  • 12 हजार सेल्फ हेल्प ग्रुपनी 3 कोटी मास्क आणि 1.20 लाख लीटर सॅनिटायझर तयार केले आहे. या कामांच्या माध्यमातून त्यांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे.

आणखी वाचा -​​​​​​​ CoronaVirus News : बिल गेट्स यांचा धक्कादायक खुलासा; 2016मध्येच ट्रम्प यांना दिला होता महामारीचा इशारा

  • रूरल इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मार्च महिन्यात राज्यांना 4,200 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  • नाबार्ड बँकेच्या माध्यमाने को-ऑपरेटिव्ह बँक आणि रिजनल रूरल बँकेला मार्चमध्ये 29,500 कोटी रुपयांची री-फायनांसिंग करण्यात आली आहे.
  • कोरोना संकटाच्या काळात शेतकरी आणि रूरल इकॉनमीसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर लोनचे वाटप करत आहे. 1 मार्चपासून 30 एप्रिलदरम्यान 86 हजार 600 कोटी रुपयांचे 63 लाख कृषी कर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
  • 25 लाख नवे किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. यांची लोन लिमिट 25 हजार कोटी रुपयांची आहे.

आणखी वाचा -​​​​​​​ CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

  • पीक कर्जाच्या परताव्याची तारीख 1 मार्च होती, ती वाढून 31 मे 2020 करण्यात आली आहे.
  • देशातील 3 कोटी शेतकऱ्यांवर जवळपास 4.22 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी लोन मोराटोरियमचा फायदा घेतला आहे.
  • राज्यांनी शेतकऱ्यांना 6700 कोटी रुपयांची मदत दिली आहे.

आणखी वाचा -​​​​​​​ CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

  • पीक कर्जा परताव्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • आजच्या घोषणा या स्थलांतरित मजूर, स्ट्रिट वेंडर, स्मॉल ट्रेडर्स आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारbankबँक