शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

सुपरस्टार राजकुमार अपहरणातील नऊ आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:22 AM

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

इरोड - कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. चंदनतस्कर वीरप्पन व त्याच्या १४ साथीदारांनी १८ वर्षांपूर्वी राजकुमार यांचे अपहरण केल्याने खळबळ उडाली होती.अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोबीचेट्टीपलायम यांनी निकाल देताना म्हटले आहे की, या नऊ जणांवरील आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे सरकारी पक्षाला न्यायालयात सादर करता आले नाहीत. या खटल्यात ४७ जणांनी साक्षी दिल्या होत्या; पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही.तामिळनाडूतील दोड्डा गजनूर या गावात असलेल्या फार्महाऊसमधून राजकुमार यांचे अपहरण करण्यात आले होते. तलवडी येथील जंगलक्षेत्रात ते १०० पेक्षा जास्त दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. या काळात तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांचे संबंध विलक्षण तणावाचे बनले होते. अखेर १०८ व्या दिवशी राजकुमार यांची अपहरणकर्त्यांनी मुक्तता केली. वीरप्पनच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.या आरोपींना नंतर जामीनही मिळाला होता. न्यायाधीशांनी निकालपत्राचे वाचन केले त्यावेळी पुत्तुसामी हा आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. पुत्तुसामी याची प्रकृती बिघडल्याने तो हजर राहू शकला नाही. महत्त्वाच्या खटल्याचा निकाल असल्याने न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)वीरप्पनची दहशतया प्रकरणी राजकुमार यांच्या पत्नीने वीरप्पन व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.२००४ साली धर्मपुरी येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत वीरप्पन व त्याचे तीन साथीदार मारले गेले होते. चंदन व हस्तीदंताची तस्करी हा वीरप्पनचा उद्योग होता.सत्यमंगलमच्या जंगलातील चंदनाची हजारो झाडे त्याने तोडली आणि हत्तींनाही ठार केले होते. त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू व कर्नाटक पोलिसांनी अनेक मोहिमा राबविल्या होेत्या.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या