शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पुढे काय?; मोदींच्या मंत्र्यानं सांगितला नेक्स्ट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 2:21 PM

केंद्रीय गृहमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली पुढील रणनीती

नवी दिल्ली: तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकार पुढे काय करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन कृषी कायदे रद्द केलेत. आता सीएए रद्द करा अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तर जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष कलम ३७० रद्द करण्यात यावं अशी मागणी करत आहेत. मात्र मोदी सरकारमधील मंत्र्यानं जम्मू-काश्मीरबद्दलचा सरकारचा पुढील प्लान सांगितला आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारचं पुढील ध्येय असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मीरपूर बलिदान दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या नेतृत्त्वाकडे कलम ३७० हटवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे, तेच नेतृत्त्व पीओकेतील पाकिस्तानचा अवैध हटवू शकतं, असं सिंह यांनी म्हटलं.

जितेंद्र सिंह प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय उपखंडाचं विभाजन मानवी इतिहासातील सर्वात मोठी समस्या आहे. जम्मू-काश्मीरचा एक हिस्सा तत्कालीन सरकारनं गमावला. त्यामुळे पाकिस्ताननं अवैध कब्जा केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं जम्मू-काश्मीर पुन्हा मिळवणं सरकारसमोरचं पुढील लक्ष्य आहे, असं सिंह म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० कधीच हटवण्यात येणार नाही असं मानलं जात होतं. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली ते शक्य झालं. त्याच प्रकारे पीओके पुन्हा मिळवण्यातही आपण यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पीओके भारतात आणणं केवळ राजकीय अजेंडा नाही, तर तो मानवाधिकारांच्या सन्मानाचाही प्रश्न आहे, असं सिंग यांनी सांगितलं.

टॅग्स :Article 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी