शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अमित शहांचा राज्यातल्या भाजप नेत्यांना 'शब्द'; फडणवीसांनी दिल्लीत घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 1:39 AM

राज्यातील भाजप नेत्यांनी घेतली भेट

सोलापूर : राज्यात अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच नवे धोरण आखणार आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी राज्यातील भाजप नेत्यांना दिले.राज्यातील साखर उद्योगाच्या विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राहुल कुल यांनी सोमवारी नवी दिल्लीत अमित शहा,धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांपुढील अडचणींचा गोषवारा मांडला. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत.केंद्र सरकारने विशेष धोरण राबवून त्यांना अर्थसहाय्य केले तरच यंदाच्या हंगामात हे कारखाने सुरू होतील आणि ऊस उत्पादकांच्या अडचणी दूर होतील, असे भाजप आमदारांनी सांगितले. केंद्र सरकार याबद्दल लवकरच धोरण जाहीर करेल. साखर कारखाने वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासंदर्भातही साखर कारखान्यांना अर्थसहाय्यासोबत विशेष धोरण अपेक्षित आहे. याबद्दल लवकरच निर्णय घेऊ, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस