शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Atal rasoi : अरे व्वा! फक्त १० रूपयात मिळणार पोटभर जेवण; तब्बल ६० ठिकाणी उघडणार 'अटल आहारकेंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:12 IST

Trending News in Marathi : याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

दिल्लीतील ३ नगर पालिकांकडून येत्या काही दिवसात अटल रसोईच्या माध्यमातून गोरगरिबांची भूक भागवण्याची तयारी सुरू आहे. अटल रसोई या योजनेअंतर्गत ६० वेगववेगळ्या भागांमध्ये फक्त १० रूपयात पोटभर जेवण मिळणार आहे. स्थानिक माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील तीन नगर पालिका क्षेत्रांमध्ये अटल रसोई सुरू करण्याचे काम वेगानं सुरू आहे. योजनेनुसार दक्षिण दिल्लीतील पालिका क्षेत्रात ४०, उत्तर दिल्ली नगर पालिकांमध्ये २० ठिकाणी अटल भोजन दिलं जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी दिलं होतं अटल रसोई उघडण्याचं आश्वासन

२०१७ मध्ये दिल्लीतील पालिका निवडणूकांच्यावेळी भाजपकडून अटल रसोईच्या माध्यमातून १० रूपयात जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं.  २०१८ मध्ये अटल आहारकेंद्र उघडण्यात आलं होतं. पण याचा विस्तार करण्यापूर्वीच कोरोना व्हायरसनं हात पाय पसरायला सुरूवात  केली. त्यामुळे अटल रसोई बंद पडली. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गौतम गंभीर यांनी 'जन रसोई' भोजनाची सुरुवात केली होती. 'जन रसोई' आपल्या संसदीय मतदार संघाद्वारे पूर्व दिल्लीतील गरजू लोकांना 1 रुपयात जेवणाची सुविधा देत आहे. गौतम गंभीर यांनी गांधी नगरमध्ये यापूर्वीच आहारकेंद्र सुरू केले असून त्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्येही असेच आहारकेंद्र सुरू करण्यात आले आहे.  गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं होतं. 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!

डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवात

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जात आहे. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते.  यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. 

टॅग्स :foodअन्नAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाdelhiदिल्लीHealthआरोग्य