शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Atal rasoi : अरे व्वा! फक्त १० रूपयात मिळणार पोटभर जेवण; तब्बल ६० ठिकाणी उघडणार 'अटल आहारकेंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:12 IST

Trending News in Marathi : याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

दिल्लीतील ३ नगर पालिकांकडून येत्या काही दिवसात अटल रसोईच्या माध्यमातून गोरगरिबांची भूक भागवण्याची तयारी सुरू आहे. अटल रसोई या योजनेअंतर्गत ६० वेगववेगळ्या भागांमध्ये फक्त १० रूपयात पोटभर जेवण मिळणार आहे. स्थानिक माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील तीन नगर पालिका क्षेत्रांमध्ये अटल रसोई सुरू करण्याचे काम वेगानं सुरू आहे. योजनेनुसार दक्षिण दिल्लीतील पालिका क्षेत्रात ४०, उत्तर दिल्ली नगर पालिकांमध्ये २० ठिकाणी अटल भोजन दिलं जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी दिलं होतं अटल रसोई उघडण्याचं आश्वासन

२०१७ मध्ये दिल्लीतील पालिका निवडणूकांच्यावेळी भाजपकडून अटल रसोईच्या माध्यमातून १० रूपयात जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं.  २०१८ मध्ये अटल आहारकेंद्र उघडण्यात आलं होतं. पण याचा विस्तार करण्यापूर्वीच कोरोना व्हायरसनं हात पाय पसरायला सुरूवात  केली. त्यामुळे अटल रसोई बंद पडली. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गौतम गंभीर यांनी 'जन रसोई' भोजनाची सुरुवात केली होती. 'जन रसोई' आपल्या संसदीय मतदार संघाद्वारे पूर्व दिल्लीतील गरजू लोकांना 1 रुपयात जेवणाची सुविधा देत आहे. गौतम गंभीर यांनी गांधी नगरमध्ये यापूर्वीच आहारकेंद्र सुरू केले असून त्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्येही असेच आहारकेंद्र सुरू करण्यात आले आहे.  गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं होतं. 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!

डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवात

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जात आहे. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते.  यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. 

टॅग्स :foodअन्नAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाdelhiदिल्लीHealthआरोग्य