शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Atal rasoi : अरे व्वा! फक्त १० रूपयात मिळणार पोटभर जेवण; तब्बल ६० ठिकाणी उघडणार 'अटल आहारकेंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:12 IST

Trending News in Marathi : याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

दिल्लीतील ३ नगर पालिकांकडून येत्या काही दिवसात अटल रसोईच्या माध्यमातून गोरगरिबांची भूक भागवण्याची तयारी सुरू आहे. अटल रसोई या योजनेअंतर्गत ६० वेगववेगळ्या भागांमध्ये फक्त १० रूपयात पोटभर जेवण मिळणार आहे. स्थानिक माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील तीन नगर पालिका क्षेत्रांमध्ये अटल रसोई सुरू करण्याचे काम वेगानं सुरू आहे. योजनेनुसार दक्षिण दिल्लीतील पालिका क्षेत्रात ४०, उत्तर दिल्ली नगर पालिकांमध्ये २० ठिकाणी अटल भोजन दिलं जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात  जेवण पुरवलं जाणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी दिलं होतं अटल रसोई उघडण्याचं आश्वासन

२०१७ मध्ये दिल्लीतील पालिका निवडणूकांच्यावेळी भाजपकडून अटल रसोईच्या माध्यमातून १० रूपयात जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं.  २०१८ मध्ये अटल आहारकेंद्र उघडण्यात आलं होतं. पण याचा विस्तार करण्यापूर्वीच कोरोना व्हायरसनं हात पाय पसरायला सुरूवात  केली. त्यामुळे अटल रसोई बंद पडली. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गौतम गंभीर यांनी 'जन रसोई' भोजनाची सुरुवात केली होती. 'जन रसोई' आपल्या संसदीय मतदार संघाद्वारे पूर्व दिल्लीतील गरजू लोकांना 1 रुपयात जेवणाची सुविधा देत आहे. गौतम गंभीर यांनी गांधी नगरमध्ये यापूर्वीच आहारकेंद्र सुरू केले असून त्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्येही असेच आहारकेंद्र सुरू करण्यात आले आहे.  गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं होतं. 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!

डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवात

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जात आहे. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते.  यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. 

टॅग्स :foodअन्नAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाdelhiदिल्लीHealthआरोग्य