शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आंदोलनाचे नवे केंद्र गाझीपूर सीमा, शेतकऱ्यांची संख्या चारपट; ५० हजार जण जमले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:55 AM

कृषी कायद्यांविराेधात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाचे मध्यवर्ती केंद्र सिंघू सीमेवर हाेते. आता ती जागा गाझीपूर सीमेने घेतली आहे. दोन दिवसांमध्ये इथल्या शेतकऱ्यांची संख्या चारपटीने वाढली आहे

- विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्यांविराेधात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाचे मध्यवर्ती केंद्र सिंघू सीमेवर हाेते. आता ती जागा गाझीपूर सीमेने घेतली आहे. दोन दिवसांमध्ये इथल्या शेतकऱ्यांची संख्या चारपटीने वाढली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते राकेश टिकैत यांना भेटायला येत आहेत. गाझीपूर सीमेवर आज ५० हजारांवर शेतकरी असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे.२६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकऱ्यांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. आंदोलक ज्या-ज्या सीमेवर बसले आहेत, त्या परिसरातील शेतकरी या आंदोलकांना हटवा म्हणून पोलिसांमध्ये तक्रार करीत आहेत. काही ठिकाणी संधी पाहून दगडफेकही करण्यात येत आहे. या कृती भाजपच्या लोकांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृहविभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरली इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.शेतकऱ्यांनी पर्यायांबाबत चर्चा  करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदीअधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदाेलनाबाबत सरकारची भूमिका मांडली. सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. कृषिमंत्री नरेंद्र ताेमर हे शेतकऱ्यांपासून फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असे मोदींनी बैठकीत सांगितले.आंदाेलनाची तीव्रता वाढली दोन वर्षांसाठी कायदा स्थगित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी तो नाकारल्यानंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराज होत शेतकऱ्यांसोबत आता पुढची बैठक नाही, असे स्पष्ट केले होते. सोमवारी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पाश्व�भूमीवर सरकारला बैठक घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.  सूत्रांनुसार केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा बोलावू शकते. असे असले, तरी शेतकऱ्यांना आंदोलनात कोणत्याही सुविधा मिळू नयेत, म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. गृह विभागाने सिंघू, गाझीपूर सीमेवरील इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.पोलिसांच्या कुटुंबीयांचे धरणे !२६ जानेवारीला पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जो संघर्ष झाला, त्यात काही पोलीसही जखमी झालेत. या घटनेचा निषेध म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शहिदी पार्क येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने या आंदोलकांना सीमेवरून हटवावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. राजकीय पक्षांचा  वाढता पाठिंबा!गेल्या दोन दिवसांपासून गाझीपूर सीमेवर विरोधी पक्षातील नेत्यांची गर्दी होत आहे. आज अभय चौटाला पोहोचले. सगळ्यांनीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. उद्या संयुक्त किसान मोर्चाची बैठक होत असून, त्यात पुढची रणनीती ठरेल.

टॅग्स :Farmerशेतकरी