शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

नेपाळमध्ये भूकंपाचा हैदोस, ७०० ठार, भारतातही ३४ दगावले

By admin | Updated: April 25, 2015 18:09 IST

नेपाळसह भारतभरात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून नेपाळमध्ये ७०० जण दगावल्याची भीती आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - नेपाळसह उत्तर व पूर्व भारतात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. आत्तापर्यंत नेपाळमध्ये सुमारे ७०० जण दगावल्याची भीती नेपाळमधल्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशमध्ये ३४ जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काठमांडूपासून ८० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून तेथील अनेक इमारती कोसळल्या तर भारतात सिक्कीम, पश्चिम बंगाल,  दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड,  सिक्कीम येथे सुमारे दोन मिनिटे भूकंपाचे धक्के बसत होते. या संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळमध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याची मदत देणारी विमाने काठमांडूला रवाना झाली असून नेपाळला लागणारी सगळ्या प्रकारची मदत भारत करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाची मदत प्रामुख्याने घेण्यात येत असून चार टन मदत साहित्य तातडीने रवाना झाले आहे. यामध्ये खाण्यापिण्याच्या साहित्याबरोबरच ढिगारे उपसण्यासाठी लागणा-या साहित्याचा समावेश आहे.
याखेरीज डॉक्टर्स आणि वैद्यकीय साहित्यही रवाना होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
काठमांडूमधला 190 वर्ष जुना असलेला धराहर टॉवर कोसळला असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक या टॉवरवर होते असे सांगण्यात येत आहे. जवळपास 400 प्रवासी टॉवरमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काठमांडूसह नेपाळमध्ये हजारो भारतीय पर्यटक व भाविक नेपाळमध्ये गेले असून त्यांच्या सुरक्षेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.
नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८१ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आली आहे. काठमांडू येथे अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत. 
तर भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली, भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता. खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे.  दरम्यान महाराष्ट्रात नागपूर व अकोला येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने अद्याप कोठेही जीवितहानी झालेली नसली तरी भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर पळ काढल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  अनेक ठिकाणी घरातील फर्निचर व सामान खाली कोसळले तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर स्क्रीन्स व भिंती हादरत होत्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूकंपग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेत असून भूकंपग्रस्तांपर्यंत तत्काळ मदत पोचवण्यात येईल अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. 
नेपाळमधील भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन क्रमांक : +977- 9851107021, +977- 9851135141