शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये भूकंपाचा हैदोस, ७०० ठार, भारतातही ३४ दगावले

By admin | Updated: April 25, 2015 18:09 IST

नेपाळसह भारतभरात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून नेपाळमध्ये ७०० जण दगावल्याची भीती आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - नेपाळसह उत्तर व पूर्व भारतात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. आत्तापर्यंत नेपाळमध्ये सुमारे ७०० जण दगावल्याची भीती नेपाळमधल्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशमध्ये ३४ जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काठमांडूपासून ८० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून तेथील अनेक इमारती कोसळल्या तर भारतात सिक्कीम, पश्चिम बंगाल,  दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड,  सिक्कीम येथे सुमारे दोन मिनिटे भूकंपाचे धक्के बसत होते. या संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळमध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याची मदत देणारी विमाने काठमांडूला रवाना झाली असून नेपाळला लागणारी सगळ्या प्रकारची मदत भारत करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाची मदत प्रामुख्याने घेण्यात येत असून चार टन मदत साहित्य तातडीने रवाना झाले आहे. यामध्ये खाण्यापिण्याच्या साहित्याबरोबरच ढिगारे उपसण्यासाठी लागणा-या साहित्याचा समावेश आहे.
याखेरीज डॉक्टर्स आणि वैद्यकीय साहित्यही रवाना होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
काठमांडूमधला 190 वर्ष जुना असलेला धराहर टॉवर कोसळला असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक या टॉवरवर होते असे सांगण्यात येत आहे. जवळपास 400 प्रवासी टॉवरमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काठमांडूसह नेपाळमध्ये हजारो भारतीय पर्यटक व भाविक नेपाळमध्ये गेले असून त्यांच्या सुरक्षेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.
नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८१ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आली आहे. काठमांडू येथे अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत. 
तर भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली, भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता. खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे.  दरम्यान महाराष्ट्रात नागपूर व अकोला येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने अद्याप कोठेही जीवितहानी झालेली नसली तरी भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर पळ काढल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  अनेक ठिकाणी घरातील फर्निचर व सामान खाली कोसळले तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर स्क्रीन्स व भिंती हादरत होत्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूकंपग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेत असून भूकंपग्रस्तांपर्यंत तत्काळ मदत पोचवण्यात येईल अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. 
नेपाळमधील भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन क्रमांक : +977- 9851107021, +977- 9851135141