शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल", नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला

By बाळकृष्ण परब | Updated: September 22, 2020 12:24 IST

कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती.

ठळक मुद्देया सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाहीशेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाहीमहसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव, चीनची घुसखोरी, कृषिविषयक विधेयके यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. केंद्रातील एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल, असे नामकरण थरूर यांनी केले आहे.काँग्रेस खासदार शशी थरून यांनी यासंदर्भातील एक कार्टुनसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात ते म्हणतात . या सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. महसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. कोरोनामुळे् झालेल्या मृत्यूंचा संशयास्पद आकडा, जीडीपीच्या वाढीबाबतची गोंधळ वाढवणारी आकडेवारी, यामधून सरकारने आपल्या एनडीए या नावाला नवा अर्थ दिला आहे. तो म्हणजे नो डाटा अव्हेलेबल. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झालेल्या मजुरांच्या संदर्भातील आकडेवारी ही सरकारकडे उपलब्ध नाही आहे. संगिता कुमारी देव, भोला सिंह, कलानिधी वीरस्वामी आणि काही अन्य सदस्यांनी लॉकडाऊन दरम्यान हजारे मजुरांचा मृत्यू झाला आहे का आणि जर झाला असेल तर त्याचे विवरण द्या, अशी मागणी केली होती.दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, श्रमिकांचे झालेले मृत्यू सर्वांनी पाहिले आहेत. मात्र सरकारला याची माहिती मिळाली नाही, असा टोल राहुल गांधींनी लगावला. मोी सरकारला लॉकडाऊनदरम्यान, किती प्रवासी मजुरांचा मृ्त्यू झाला आणि किती नोकऱ्या गेल्या याची माहिती नाही, असा टोला लगावला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी