शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 10:02 IST

राज्यसभा सभागृहात सत्ताधारी एनडीए सरकारला कुठलेही विधेयक मंजूर करण्यासाठी आता दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. 

नवी दिल्ली - राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. ९ राज्यातील १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएनं ११ आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपाचे ९, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा १, राष्ट्रीय लोक मोर्चा १ आणि काँग्रेस १ सदस्य बिनविरोध राज्यसभेत पोहचलेत. त्यामुळे आता राज्यसभेत महत्त्वाची विधेयके मंजुर करण्यासाठी एनडीएकडे पर्याप्त मते आहेत. त्यांना दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

NDA ने पहिल्यांदाच राज्यसभेत बहुमत मिळवलं आहे. २४५ सदस्यांपैकी राज्यसभेत अद्याप ८ जागा रिक्त आहेत. त्यात ४ जम्मू काश्मीर आणि ४ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. सभागृहात सध्याच्या आकडेवारीनुसार २३७ सदस्य संख्या आहे. त्यात बहुमताचा आकडा ११९ इतका आहे. राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) ११२ सदस्य आहेत तर ६ नामनिर्देशित सदस्य आणि १ अपक्ष सदस्य असे मिळून हा आकडा ११९ पर्यंत पोहचला आहे याचा अर्थ एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे.

भाजपाची सदस्य संख्या ९६

राज्यसभेत भाजपा सदस्य संख्या ९६ इतकी आहेत तर काँग्रेस सदस्यांची संख्या वाढून २७ झाली आहे. काँग्रेसच्या मित्रपक्षाकडे ५८ सदस्य आहेत, त्यामुळे विरोधकांचे संख्याबळ ८५ इतके आहे. ११ सदस्य असलेली वायएसआर काँग्रेस पार्टी आणि ८ सदस्यांची बीजेडी हे कुठल्याही आघाडीचा भाग नाही. आता निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी २०२८ पर्यंत असणार आहे. 

राज्यसभेत निवडून आलेल्या ते १२ जण कोण?

जे सदस्य राज्यसभेत बिनविरोध निवडून आलेत, त्यात आसाममधून भाजपाचे मिशन रंजन दास, रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मित्रा, हरियाणातून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशातून ममता मोहंता, राजस्थानातून रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरातून राजीव भट्टाचार्य यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पाटील, राष्ट्रीय लोक मोर्चातून उपेंद्र कुशवाहा, तेलंगणातून काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आलेत. 

दरम्यान, राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी एनडीए एक दशकापासून प्रयत्नशील होती. महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि एआयडिएमकेसारख्या पक्षांवर भाजपाला अवलंबून राहावे लागत होते. मागील काही वर्षात राज्यसभा सभागृहात विरोधकांचा आवाज दिसला. विरोधकांनी संख्याबळाच्या आधारे अनेक सरकारी विधेयके रोखली. सरकारने अनेक विधेयके नवीन पटनायक यांची बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस अध्यक्ष जनमोहन रेड्डी यांच्या मदतीने मंजूर केली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात बीजेडी, वायएसआर काँग्रेस सत्तेबाहेर गेलेत. दोन्ही राज्यात भाजपा आणि एनडीएचे सरकार आहे. त्यातच काँग्रेससाठीही चांगली बातमी आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद साबूत ठेवण्यासाठी विरोधी पक्षाकडे २५ सदस्यांची गरज असते. काँग्रेसकडे आता बहुमतापेक्षा २ सदस्य जास्त आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीAjit Pawarअजित पवार