शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

NCP vs BJP: "भाजपाबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही केंद्राकडून संरक्षण देण्याची व्यवस्था होईल"; राष्ट्रवादीच्या मंत्र्याने लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:35 IST

गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका

NCP vs BJP: महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात भाजप विरूद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांचे नेते प्रचंड आक्रमक होत असल्याचे चित्र आहेत. गेल्या काही महिन्यात भाजपाचेकिरीट सोमय्या आणि रवी राणा-नवनीत राणा हे नेते  शिवसेनेविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या नेत्यांवर अपेक्षित कारवाई करण्यात आली. तसेच काही कार्यकर्ते या नेत्यांविरोधात आक्रमक झाले. त्यामुळे भाजपाच्या काही नेत्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. त्यावरूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला.

"अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे. केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्याची दोन-तीन उदाहरणे दिसू लागली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपाबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते", असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. पुढे बोलताना असेही म्हणाले, "राज ठाकरे यांना कोणी इजा करेल, असे मला वाटत नाही. राज ठाकरे यांना धोका आहे पण त्यांना भीती वाटत असेल, तर त्यांना संरक्षण दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही."

सदाभाऊ खोत यांच्या महागाई संदर्भातील वक्तव्याबाबतही त्यांनी मत मांडले. उपरोधिकपणे सदाभाऊ खोत भाजपाच्या विरोधात बोलू शकत नाहीत, कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे. अशा वेळी काय बोलायचं ते त्यांना कळत नसावे, अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे. या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. एवढी प्रचंड महागाई आहे. शंभरीपार पेट्रोल गेले आहे तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्या