शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:32 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: ईव्हीएम मशीन आणि मतदारांच्या संख्येवरून राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

NCP SP Group MP Supriya Sule News: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालांनी अनेकांना धक्के बसले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेली महाविकास आघाडी भुईसपाट झाली, तर लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या महायुतीने विधानसभेत जोरदार कमबॅक करत ऐतिहासिक विजय मिळवला. या गोष्टीला आता काही महिने उलटून गेले असले तरी विरोधक मात्र ईव्हीएम मशीनचा मुद्दा घेऊन टीका करताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत विरोधकांनी ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत काही आकडेवारीच मांडली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील डेटा मीडियासमोर सादर केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आणि त्यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याचे सांगितले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर आमदार म्हणून निवडून आले. उत्तम जानकर यांचे असे म्हणणे आहे की, मी निवडून आलो आहे, परंतु मतदान जे व्हायला हवे होते, तसे झाले नाही. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रत असे अनेक विधानसभा मतदारसंघात घडले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याला स्वत:चे मत मिळालेले नाही. याबाबतचा सर्व डेटा तुमच्यासमोर आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोग सरकारची गुलामी करते आहे. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचे डोके फोडले. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी