शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:32 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: ईव्हीएम मशीन आणि मतदारांच्या संख्येवरून राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

NCP SP Group MP Supriya Sule News: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालांनी अनेकांना धक्के बसले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेली महाविकास आघाडी भुईसपाट झाली, तर लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या महायुतीने विधानसभेत जोरदार कमबॅक करत ऐतिहासिक विजय मिळवला. या गोष्टीला आता काही महिने उलटून गेले असले तरी विरोधक मात्र ईव्हीएम मशीनचा मुद्दा घेऊन टीका करताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत विरोधकांनी ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत काही आकडेवारीच मांडली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील डेटा मीडियासमोर सादर केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आणि त्यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याचे सांगितले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर आमदार म्हणून निवडून आले. उत्तम जानकर यांचे असे म्हणणे आहे की, मी निवडून आलो आहे, परंतु मतदान जे व्हायला हवे होते, तसे झाले नाही. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रत असे अनेक विधानसभा मतदारसंघात घडले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याला स्वत:चे मत मिळालेले नाही. याबाबतचा सर्व डेटा तुमच्यासमोर आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोग सरकारची गुलामी करते आहे. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचे डोके फोडले. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी