शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

EVM च्या वादावर खासदार अमोल कोल्हेंचा नवा फॉर्म्युला, संसदेत काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 10:08 IST

निवडणुकीत आपले मत हरवले की चोरी गेले असा अनेक मतदारांना संशय आहे पण निवडणूक आयोगाने असं काही झाले नाही सांगितले असा आरोप कोल्हेंनी केला.

नवी दिल्ली - EVM हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांचा नाही. लोकशाही मजबूत राहण्यासाठी जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असणं गरजेचे आहे. आपले मत कुठे जातंय हे जाणून घ्यायचा अधिकार मतदारांना असला पाहिजे. त्यासाठी त्यांना मत कसं करायचं हे ठरवण्यासाठी पर्याय दिले पाहिजे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.

संविधानाच्या चर्चेवेळी अमोल कोल्हे यांनी सोलापूरच्या मारकडवाडीचा मुद्दा लोकसभेत मांडला. अमोल कोल्हे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत तिथल्या लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली, नेमकं त्यांची मते गेली कुठे असा प्रश्न लोकांना पडला होता. प्रशासनाने ते रोखले. मी ईव्हीएमवर निवडून आलोय, परंतु ज्या मतदारांना संशय आहे त्यांची समस्या इथं मांडणे माझे कर्तव्य आहे. ना त्यांनी निवडणुकीवर आक्षेप घेतला, ना त्यांनी निकालावर आक्षेप घेतला, तिथे उमेदवार जिंकून आलेत तरीही मत हरवले की चोरी गेले हे लोकांना जाणून घ्यायचं आहे पण त्यांना रोखणे हा कुठला राजनैतिक अधिकार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच निवडणूक आयोगाची स्थापनाच पारदर्शक निवडणुकांसाठी झाला आहे. त्यामुळे ५ टक्के ईव्हीएममध्ये मॉकपोल ऐवजी मत पडताळणी केली जावी. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमचा लॉक डेटा उमेदवारांना दिला जावा. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तिथे काय खायचे हा पर्याय दिला जातो. परंतु निवडणुकीत मतदान बॅलेटवर घ्यायचे की ईव्हीएमवर करायचे हा पर्याय मतदारांना का दिला जात नाही. ज्याचा विश्वास बॅलेट पेपरवर असेल त्याने तिथे मतदान करावे. ज्याला ईव्हीएमवर विश्वास आहे त्याने ईव्हीएमवर मतदान करावे. देशाच्या अमृतकाळात ही संधी आहे. मतदारांना त्यांचे मत गेले कुठे हे समजायला हवे तेव्हाच लोकशाही मजबूत होईल अशी मागणी अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.

दरम्यान, आपल्या संविधानाने एक व्यक्ती, एक मत स्वीकारलं आहे. संविधानातील हे वैशिष्ट आहे ज्यात देशातील झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसालाही मताचा अधिकार आहे आणि पंतप्रधानांनाही एका मताचा अधिकार आहे. त्यामुळे संविधानाने मत देण्याचा केवळ अधिकारच दिला नाही तर ही अनमोल भेट आहे. परंतु आपली एखादी किंमती वस्तू हरवली तर आपण काय करतो, तक्रार करतो परंतु जर पोलीस म्हणाले चोरी झाली नाही मग आपण स्वत: शोध घेतो. तपास करतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपले मत हरवले की चोरी गेले असा अनेक मतदारांना संशय आहे पण निवडणूक आयोगाने असं काही झाले नाही सांगितले असा आरोप कोल्हेंनी केला.

'दाल मै कुछ काला है' की.... 

लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला फार महत्त्व आहे. मतदारांमध्ये संशय आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या ६ महिन्याच्या काळात लाखो मतदारांची नावे यादीत जोडली गेली. मात्र नव्याने नावे वाढवलेली यादी निवडणूक आयोगाकडे मागणी करूनही दिली जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ५ टक्के VVPAT ची मतमोजणी केली जावी असं असताना निवडणूक आयोगाने नवी सूचना काढून केवळ मॉकपोल घेतला जाईल असं म्हटलं. त्यामुळे संशय आणखी बळावला जातो. मराठीत म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला...जर तुम्ही काही केले नाही तर घाबरता का...मग काही लपवण्याचा प्रयत्न होतोय का असं वाटते. 'दाल मै कुछ काला है या पुरी दाल ही काली है' असा टोला खासदार कोल्हे यांनी सत्ताधारी भाजपाला लगावला. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेEVM Machineईव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग