शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

नक्षलवाद्यांनी मोबाइल टॉवर आणि पंचायतीची इमारत उडवली, काही जणांचे अपहरण केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 8:44 AM

घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पटणा:बिहारच्याऔरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी एक मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पंचायत इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफची टीम आणि मदनपूर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून परिसरात घेराव घातला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

घटना मदनपूरच्या जुदाही भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुडाही येथे आलेल्या सुमारे डझनभर नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवला. यानंतर आयईडी फोडून पंचायत भवनाचेही मोठे नुकसान केले. याशिवाय नक्षलवाद्यांनी काही लोकांना पकडून जंगलाच्या दिशेने नेल्याचेही बोलले जात आहे.

अपहरण झाल्याची पुष्टी नाहीः एसपी

औरंगाबादचे एसपी कांतेशकुमार मिश्रा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे एक पथक पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण, काही लोकांचे अपहरण केल्याची पुष्टी अध्याप करता येणार नाही. याची माहिती सध्या घेतली जात आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर स्पष्टपणे यावर बोलता येईल.

सीपीआय-माओवाद्यांकडून बंदची हाक 

नक्षलवादी संघटना CPI-Maoist ने 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बंद पुकारला आहे. आपला सहकारी माओवादी नेता प्रशांत घोष उर्फ ​​किशन दा आणि त्याची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. चार दिवसांच्या कालावधीत नक्षलवाद्यांकडून दुसऱ्यांदा बंद पुकारण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदबाबत बिहार-झारखंडचे पोलिस सर्व महामार्गांवर सतत गस्त घालत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारAurangabadऔरंगाबाद