शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राष्ट्रीय सुरक्षा हासुद्धा या निवडणुकांमधील महत्त्वाचा मुद्दा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 6:06 AM

राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

पालीगंज : राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, दहशतवादाला आक्रमक शैलीतच उत्तर देणे योग्य असून तेच धोरण माझ्या सरकारने अंगिकारले आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकांतील मुद्दा होऊ शकत नाही, असे विरोधकांच्या महाभेसळ आघाडीचे मत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत निरपराध माणसे मरण पावत असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसूनच मारले पाहिजे आणि हवाई दलाने त्यामुळेच पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले की, काहीजण जातीपातीचे राजकारण करून सत्ता मिळविण्याचा खटाटोप करत आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणताना हे नेते स्वत:च्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र डावलत आहेत.काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४मध्ये दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगलींबाबत ‘झाले ते झाले' असे उद्गार काढले होते. त्याबद्दलमोदी म्हणाले की, पित्रोदांच्या उद्गारांतून विरोधकांचा उद्धटपणा व क्षमा न मागण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडते. (वृत्तसंस्था)

विकासाची गंगा आणूनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांतपुन्हा भाजपच जिंकणार आहे. पंतप्रधानपदाच्या पुढच्या कारकीर्दीत मी बिहारमध्ये नव्याने विकासाची गंगा आणेन. लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातही भाजप व त्याच्या मित्रपक्षांनाच भरघोस मतदान करण्याचेआवाहन त्यांनी जनतेला केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक