शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

'मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित', शशी थरुर यांचं वादग्रस्त ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 12:33 IST

'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसताना शशी थरुर यांनी आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून वारंवार वादग्रस्त विधान करुन काँग्रेसचे नेते शशी थरूर चर्चेत असल्याचं दिसत आहे. 'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसताना शशी थरुर यांनी आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे.  'देशातील कित्येक ठिकाणी मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित आहे', असे वादग्रस्त ट्विट थरुर यांनी रविवारी (22 जुलै) केले आहे. या ट्विटमुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

थरुर यांनी असे ट्विट केले आहे की, 'जातीय हिंसाचारात घट होण्याबाबत भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आलेले दावे वस्तुस्थितीत खरे का उतरत नाहीत. यावरुन असे दिसते की कित्येक ठिकाणी मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित आहे.'

(मला पाकिस्तानात जा म्हणणारे हे कोण?, शशी थरुर यांचा भाजपा, RSSवर हल्लाबोल)

गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावानं केलेल्या मारहाणीत 28 वर्षीय अकबर खानचा मृत्यू झाला. या घटनेबाबत निषेध नोंदवताना शशी थरुर यांनी हे वादग्रस्त ट्विट केले आहे. 

नेमकी काय आहे घटना?

मूळ हरियाणा जिल्ह्याचा रहिवासी, पण राजस्थानात गोपालन व दूध व्यवसाय करणाऱ्या अकबर खानला रामगड गावी ठार करण्यात आले. तो हत्येसाठी गाय नेत असावा, असा संशय गोरक्षकांना आला आणि जमावानं त्याला ठार केले. त्याच्याबरोबर एक मित्रही होता. दोन जणांनी अन्य गावकऱ्यांना बोलावून त्यांना मारहाण केली. विचारपूस करण्याआधीच जमावानं त्याला व त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर खान मरण पावला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील कोलगाव येथून त्यानं गायी आणल्या होत्या आणि त्या घरी नेत होता, अशी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी अकबरच्या वडिलांनी केली आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcowगायTwitterट्विटरBJPभाजपा