शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 13:19 IST

Narendra Singh Tomar And Punjab : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपालापंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. तसेच निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक निकालाचा संबंध शेतकर्‍यांच्या आंदोलनाशी जोडणं चुकीचं आहे. पंजाबमध्ये आमची स्थिती कमकुवत होती असं म्हणत यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. 

"आम्ही याआधी अकाली दलाबरोबर युती करून निवडणुका लढवायचो. पण आम्ही यावेळी स्वबळावर निवडणूक लढवली असून यामुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं आहे" असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी आसाममधील विधानसभा निवडणुकांसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला देखील उत्तर दिलं आहे. "आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने आहे. राज्यात प्रो इनकंबेन्सी आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा अधिक जागा जिंकेल. मागील सरकारमध्ये जे घडलं ते आसामच्या जनतेने पाहिलं आहे. तसेच भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. विकासाचा पत्ताच नव्हता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती." 

"आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने, पुन्हा भाजपाचा विजय होणार"

"आसाममध्ये अँटी इनकंबेन्सीऐवजी प्रो-इनकंबेन्सी पाहायला मिळत आहे. हे भाजपासाठी एक चांगलं चिन्ह आहे आणि आशा आहे की भाजपा पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल" असा दावा तोमर यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. आसाममध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन झाली आहे. त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आहे असं नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात मोठा विजय मिळवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं

भाजपा खासदारसनी देओल (Sunny Deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला असून नाकी नऊ आले आहेत. सनी देओल यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराला फक्त नऊ मतं मिळाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपाच्या किरण कौर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना अवघी नऊ मतं मिळाली आहेत. यामुळेच संतप्त झालेल्या किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. तरी देखील फक्त 9 मतं कशी पडली असा सवाल विचारत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरAssamआसामElectionनिवडणूक