शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 13:19 IST

Narendra Singh Tomar And Punjab : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपालापंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. तसेच निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक निकालाचा संबंध शेतकर्‍यांच्या आंदोलनाशी जोडणं चुकीचं आहे. पंजाबमध्ये आमची स्थिती कमकुवत होती असं म्हणत यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. 

"आम्ही याआधी अकाली दलाबरोबर युती करून निवडणुका लढवायचो. पण आम्ही यावेळी स्वबळावर निवडणूक लढवली असून यामुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं आहे" असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी आसाममधील विधानसभा निवडणुकांसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला देखील उत्तर दिलं आहे. "आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने आहे. राज्यात प्रो इनकंबेन्सी आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा अधिक जागा जिंकेल. मागील सरकारमध्ये जे घडलं ते आसामच्या जनतेने पाहिलं आहे. तसेच भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. विकासाचा पत्ताच नव्हता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती." 

"आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने, पुन्हा भाजपाचा विजय होणार"

"आसाममध्ये अँटी इनकंबेन्सीऐवजी प्रो-इनकंबेन्सी पाहायला मिळत आहे. हे भाजपासाठी एक चांगलं चिन्ह आहे आणि आशा आहे की भाजपा पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल" असा दावा तोमर यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. आसाममध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन झाली आहे. त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आहे असं नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात मोठा विजय मिळवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं

भाजपा खासदारसनी देओल (Sunny Deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला असून नाकी नऊ आले आहेत. सनी देओल यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराला फक्त नऊ मतं मिळाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपाच्या किरण कौर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना अवघी नऊ मतं मिळाली आहेत. यामुळेच संतप्त झालेल्या किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. तरी देखील फक्त 9 मतं कशी पडली असा सवाल विचारत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरAssamआसामElectionनिवडणूक