शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:22 IST

मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि......

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरातून होणारी टीका सहन करून शिवसेना उभी केली, सारे आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केले. त्यांच्या त्यागाबद्दल, संकल्पशक्तीबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी, प्रेमापोटी मी शिवसेनेविरोधात चकार शब्दही काढणार नाही’... हे उद्गार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. सांगलीतील तासगाव इथं झालेल्या निवडणूक प्रचारसभेतले. सेनेचे प्रमुख नेते भाजपावर टीकास्त्र सोडत होते, युती तोडल्याचं खापर मोदी-शहांवर फोडत होते. पण मोदींनी चतुराई दाखवत आपल्या या 'मित्रा'वर कुरघोडी केली होती. बाळासाहेबांचा गौरव करून त्यांनी अगदी शिवसैनिकांचीही मनं जिंकली होती आणि त्याचा चांगलाच राजकीय फायदा भाजपाला झाला होता. चार वर्षांच्या कार्यकाळात, कामाच्या व्यापात मोदी बहुधा हे सगळं विसरले आणि पाच राज्यांच्या निवडणुकीत एक मोठी चूक करून बसले. 

आपली जीभ किंवा वाणी हे एक प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. ते योग्य रितीने वापरलं तर आपण अनेक लढाया जिंकू शकतो. पण, त्यात जरा जरी चूक झाली तरी घात होतो. कारण, तोंडातून गेलेला शब्द मागे घेता येत नाही. त्यामुळे राजकारणात तर कुठे काय बोलायचं याचं भान पदोपदी बाळगायला हवं. वास्तविक, नरेंद्र मोदी अनेक वर्षं हे अस्त्र अचूक वापरतात. मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि त्याची मोठी किंमत भाजपाला मोजावी लागली, असं राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील निकाल पाहून म्हणावं लागेल. तो शब्द होता, विधवा! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख भर सभेत अशा पद्धतीने करणं, तोही मोदींनी, निश्चितच धक्कादायक होतं-आहे. 

एकूणच, देशभरात निवडणूक प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. एकमेकांना वाट्टेल ते बोललं जातंय. पण, काही नेते आपली पत-प्रतिष्ठा सांभाळून बोलतात. त्यापैकी मोदीही आहेत. आता 'होते' म्हणावं लागेल. सोनिया आणि राहुल गांधींवर त्यांनी अनेकदा टीका केली, पण तोल सुटला नव्हता. यावेळी मात्र जीभ घसरली आणि तीन राज्यांतली सत्ता गेली. अर्थात, भाजपाच्या अपयशाची बरीच कारणं आहेत. सरकारविरोधी वातावरण असेल, काँग्रेसने केलेला प्रचार असेल, राजस्थानात वसुंधरा राजेंबद्दलची नाराजी असेल किंवा आणखीही बरेच. पण, त्या शब्दानेही घोळ केलाच.

गुजरातच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना 'मौत का सौदागर' म्हटलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण पाहिलंय. मणिशंकर अय्यर यांच्या 'नीच' या शब्दामुळे काय झालं, हेही आपल्याला ठाऊक आहे. हा इतिहास पाहता, विधवा हा उल्लेख निवडणुकीत निर्णायक ठरणारा नसला, तरी तो निकालावर परिणाम करू शकतो, यात काहीच शंका नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं - करताहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूनच देशानं एकदा नव्हे तर दोनदा काँग्रेसकडे सत्ता सोपवली होती. विधवा म्हणून त्यांचा उल्लेख केल्यानं मोठा वर्ग दुखावला जाणं स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी मोदींना निश्चित टाळता आली असती. 

अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे सुटलेला शब्द परत घेता येणार नाही. पण, यापुढे काळजी नक्कीच घेता येईल. प्रथेप्रमाणे भाजपा पराभवाचं चिंतन करेलच. तेव्हा, अशा चुका टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही विचार केल्यास ते त्यांच्याच हिताचं ठरेल. कारण, संत तुकाराम महाराजांनीच सांगून ठेवलंय, घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा