शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:22 IST

मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि......

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरातून होणारी टीका सहन करून शिवसेना उभी केली, सारे आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केले. त्यांच्या त्यागाबद्दल, संकल्पशक्तीबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी, प्रेमापोटी मी शिवसेनेविरोधात चकार शब्दही काढणार नाही’... हे उद्गार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. सांगलीतील तासगाव इथं झालेल्या निवडणूक प्रचारसभेतले. सेनेचे प्रमुख नेते भाजपावर टीकास्त्र सोडत होते, युती तोडल्याचं खापर मोदी-शहांवर फोडत होते. पण मोदींनी चतुराई दाखवत आपल्या या 'मित्रा'वर कुरघोडी केली होती. बाळासाहेबांचा गौरव करून त्यांनी अगदी शिवसैनिकांचीही मनं जिंकली होती आणि त्याचा चांगलाच राजकीय फायदा भाजपाला झाला होता. चार वर्षांच्या कार्यकाळात, कामाच्या व्यापात मोदी बहुधा हे सगळं विसरले आणि पाच राज्यांच्या निवडणुकीत एक मोठी चूक करून बसले. 

आपली जीभ किंवा वाणी हे एक प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. ते योग्य रितीने वापरलं तर आपण अनेक लढाया जिंकू शकतो. पण, त्यात जरा जरी चूक झाली तरी घात होतो. कारण, तोंडातून गेलेला शब्द मागे घेता येत नाही. त्यामुळे राजकारणात तर कुठे काय बोलायचं याचं भान पदोपदी बाळगायला हवं. वास्तविक, नरेंद्र मोदी अनेक वर्षं हे अस्त्र अचूक वापरतात. मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि त्याची मोठी किंमत भाजपाला मोजावी लागली, असं राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील निकाल पाहून म्हणावं लागेल. तो शब्द होता, विधवा! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख भर सभेत अशा पद्धतीने करणं, तोही मोदींनी, निश्चितच धक्कादायक होतं-आहे. 

एकूणच, देशभरात निवडणूक प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. एकमेकांना वाट्टेल ते बोललं जातंय. पण, काही नेते आपली पत-प्रतिष्ठा सांभाळून बोलतात. त्यापैकी मोदीही आहेत. आता 'होते' म्हणावं लागेल. सोनिया आणि राहुल गांधींवर त्यांनी अनेकदा टीका केली, पण तोल सुटला नव्हता. यावेळी मात्र जीभ घसरली आणि तीन राज्यांतली सत्ता गेली. अर्थात, भाजपाच्या अपयशाची बरीच कारणं आहेत. सरकारविरोधी वातावरण असेल, काँग्रेसने केलेला प्रचार असेल, राजस्थानात वसुंधरा राजेंबद्दलची नाराजी असेल किंवा आणखीही बरेच. पण, त्या शब्दानेही घोळ केलाच.

गुजरातच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना 'मौत का सौदागर' म्हटलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण पाहिलंय. मणिशंकर अय्यर यांच्या 'नीच' या शब्दामुळे काय झालं, हेही आपल्याला ठाऊक आहे. हा इतिहास पाहता, विधवा हा उल्लेख निवडणुकीत निर्णायक ठरणारा नसला, तरी तो निकालावर परिणाम करू शकतो, यात काहीच शंका नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं - करताहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवूनच देशानं एकदा नव्हे तर दोनदा काँग्रेसकडे सत्ता सोपवली होती. विधवा म्हणून त्यांचा उल्लेख केल्यानं मोठा वर्ग दुखावला जाणं स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी मोदींना निश्चित टाळता आली असती. 

अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे सुटलेला शब्द परत घेता येणार नाही. पण, यापुढे काळजी नक्कीच घेता येईल. प्रथेप्रमाणे भाजपा पराभवाचं चिंतन करेलच. तेव्हा, अशा चुका टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही विचार केल्यास ते त्यांच्याच हिताचं ठरेल. कारण, संत तुकाराम महाराजांनीच सांगून ठेवलंय, घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा