शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नरेंद्र मोदींमध्ये असुरक्षिततेची भावना, खोटेपणा त्यांच्या सरकारची ओळख - अरुण शौरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे.

ठळक मुद्देमोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मोठया प्रमाणावर असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात मोठया प्रमाणावर अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. मी आजच्या इतके कुठलेही पंतप्रधान कार्यालय कमकुवत पाहिलेले नाही अशा शब्दात प्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

अरुण शौरी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. खोटेपणा ही मोदी सरकारची ओळख आहे. नोक-या निर्मिती आणि अन्य आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. नवी दिल्लीत आयोजित 'टाइम्स लिट फेस्ट'मध्ये ते बोलत होते. जी व्यक्ती मानसिक दृष्टया सुरक्षित आहे ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत निराश होणार नाही आणि ज्या व्यक्तीमध्ये असुरक्षिततेची भावना आहे अशी व्यक्ती जो तज्ञ आहे, ज्याला एखाद्या विषयातले कळते त्याला स्वत:च्या जवळ येऊ देणार नाही. 

आज गाढव घोडे बनले आहेत आणि नेते ठरवू शकतात त्यांना कोणाबरोबर रहायच आहे असे शौरी म्हणाले. मोदी असुरक्षित असल्यामुळे पंतप्रधान कार्यालय कमकुवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना स्वत:चा जनाधार नाहीय. त्यामुळे त्यांच्यापासून मोदींना काहीही धोका नाही असे शौरी म्हणाले. टीकेच्या बाबतीत मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अत्यंत संवेदनशील आहे असे शौरी म्हणाले. अरुण शौरी, यशवंत सिन्हा हे मोदी सरकारचे विरोधक समजले जातात. दोघांनी यापूर्वीही अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन दोनवर्षांपूर्वी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष  अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे तिघेच आज भाजपा चालवत आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती. या तिघांनी वेळोवळी विरोधकांचा उपमर्द तर केलाच पण स्वपक्षीयांच्या मनातही भीती निर्माण केल्याचा आरोप शौरी यांनी केला होता. योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याने आवश्यक तिथे बदल होत नाहीत, असे मत त्यांनी नोंदवले. तसेच मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सरकारचा कारभार काही बाबतीत चांगला असला तरी आर्थिक चित्र पालटण्याचे आश्वासन मात्र पाळण्यात आलेलं नाही, असही शौरी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Arun Shourieअरुण शौरीNarendra Modiनरेंद्र मोदी