शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 14:05 IST

गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवताना भाजपाची दमछाक झाली होती. काँग्रेसची कडवी झुंज मोडीत काढत भाजपाने अखेर 99 जागांसह कसेबसे बहुमत मिळवत नामुष्की टाळली होती. मात्र गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विजयाचा जल्लोष करताना, आत्मपरीक्षणही करा, ही जागं होण्याची वेळ आहे. अशा कडक शब्दात मोदींनी भाजपाच्या गुजरातमधील स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली आहे.

गुजरातमधील मतमोजणीदरम्यान काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर सुरू असताना दुपारच्या सुमारास हा मेसेज गुजराती नेत्यांच्या मोबाईलवर आला. या मेसेजनंतर मात्र ढोलताशे घेऊन भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी सज्ज झालेल्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण असतानाही सत्ता राखण्यात भाजपाला यश मिळाले. पण काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 80 जागा पटकावल्याने मोदी अस्वस्थ झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी गुजराती नेत्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिल्याची चर्चा आहे.

भाजपाने 2012 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 115 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी पक्षाच्या जागांमध्ये 15 जागांची घट झाली आहे. त्यातही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी जोर लावला नसता तर गुजरात भाजपाच्या हातून निसटले असते असे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले होते. मोदींनी गुजरात जिंकवून दिले असले तरी काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरल्याचे चित्र दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

गुजरात या मोदी यांच्या बालेकिल्ल्यावरच राहुल गांधी यांनी घाव घातला. दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी आवाज उठवला. सोशल मीडियावर मोदी व अमित शहा यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही केली. विकासाच्या मुद्द्यावर बोलतीच बंद केली. यामुळेच भाजपा शंभरीही गाठू शकली नाही. काल लागलेल्या निकालांमध्ये गुजरात आणि हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले असले तरी गुजरातमध्ये काँग्रेसने केलेली दमछाक बघता पुढील वर्षी आठ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये भाजपाला कसरत करावी लागेल.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात