शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:32 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.

ठळक मुद्देपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले आहे.अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय असंही म्हटलं आहे.

चंदीगढ - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (4 जानेवारी) हे वक्तव्य केले आहे.

'गेल्या पाच वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक आश्वासन सांगावं' असं  आव्हान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. मोदींनी गुरुवारी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ‘नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. लोकांनाही आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’ असं सिंग यांनी म्हटले आहे. 

अमरिंदर सिंग यांनी 'नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय' असंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसनेपंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत’.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपा