शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:32 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.

ठळक मुद्देपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले आहे.अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय असंही म्हटलं आहे.

चंदीगढ - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (4 जानेवारी) हे वक्तव्य केले आहे.

'गेल्या पाच वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक आश्वासन सांगावं' असं  आव्हान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. मोदींनी गुरुवारी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ‘नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. लोकांनाही आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’ असं सिंग यांनी म्हटले आहे. 

अमरिंदर सिंग यांनी 'नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय' असंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसनेपंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत’.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपा