शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:31 IST

नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २०६ रॅली केल्या, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीतून आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: भाजप व काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. भाजपकडून नरेंद्र मोदींकडून सर्वाधिक २०६ रॅली आणि रोड, तर राहुल गांधींनी १०७  रॅलीत रोड शो आणि सभांतून आपला मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी प्रचारात प्रत्येक टप्प्यात विविध मुद्दे उपस्थित करत विरोधकांना हैराण केले, तर राहुल गांधी यांचा प्रचार संविधानाचे संरक्षण आणि पाच घोषणाभोवती केंद्रित राहिला.

नरेंद्र मोदी - दरवेळी नवा मुद्दा

  • नरेंद्र मोदींच्या रॅली, सभा

उत्तर प्रदेश ३१, बिहार २०, महाराष्ट्र १९, बंगाल १८, ओडिशा १०, मध्य प्रदेश १०, गुजरात ५, पंजाब ४, हरयाणा ३, हिमाचल २, दिल्ली २, उत्तराखंड २, जम्मू-काश्मीर १, पूर्वोत्तर २

नरेंद्र मोदींनी केलेली प्रमुख वक्तव्ये

  • विरोधक सनातन संपवतील
  • इंडिया आघाडीची मंगळसूत्रावर नजर
  • काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल
  • काँग्रेस रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवेल
  • इंडिया आघाडी जिंकल्यास प्रत्येक वर्षी पंतप्रधान बदलेल
  • ते हिंदूंना भगीरथी नदीत बुडवतील 
  • विरोधकांना आपल्या पिचवर खेळविले

१९ एप्रिलपर्यंत मोदींनी आक्रमक टीका केली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यापासून त्यांनी कठोर वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. महिलांचे मंगळसूत्र ते मुस्लीमांना धर्माच्या आधारावर आरक्षण या वक्तव्यांमुळे मोदींनी विरोधकांना आपल्यावर पिचवर फसविण्याचा प्रयत्न केला.

  • ३६० डिग्रीमध्ये फिरले मोदी

मोदींनी गुरुवारी पंजाबमध्ये शेवटची सभा घेत ध्यान करण्यासाठी ते थेट कन्याकुमारीला पोहोचले. मोदींनी १५ मार्च रोजी कन्याकुमारीत प्रचार सुरू केला होता.

-----------------

  • राहुल गांधी - पाच मुद्द्यांवर ठाम

  • राहुल गांधींच्या रॅली, सभा

यूपी १७, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली प्रत्येकी ६, म. प्रदेश ५, केरळ १४, महाराष्ट्र १३, पंजाब ४, राजस्थान, ओडिशा, गुजरात प्रत्येकी ३, हरयाणा ४, हिमाचल २, झारखंड २, तामिळनाडू २, छत्तीसगड २

राहुल गांधींनी केलेली प्रमुख वक्तव्ये

  • बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला ८,५०० रुपये देणार
  • आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर नेणार
  • महिलांना प्रत्येक वर्षी १ लाख रुपये
  • महिलांचे आरक्षण तत्काळ लागू
  • शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी
  • लोकशाही आणि संविधान वाचविणार 
  • आरक्षणावरून राहुल गांधींनी भाजपला घेरले

राहुल गांधी यांनी पाच न्याय गॅरंटीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी भाजपच्या ४०० पारचा नारा मुद्दा बनवत भाजप नेते आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून भाजप मोठ्या प्रमाणात अडकली. यावरून मोदींना सतत उत्तर द्यावे लागले.

  • राहुल गांधी बदलले

राहुल गांधी यांनी आपली भाषणशैली वेगळी ठेवली. त्यांनी प्रत्येक सभेत हातात संविधानाची प्रत घेऊन भाषण केले. मेट्र, टेम्पोतून लोकांशी संवाद साधला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी