शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:37 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ''नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खोटेपणाचा वापर केला. मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत,'' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. वायनाड येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. आज राष्ट्रीय पातळीवर आम्ही विषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द वापरतोय, असे तुम्हाला वाटत असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत. राग आणि द्वेषाचा वापर करून ते देशातील जनतेमध्ये फूट पाडत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी खोटेपणाचा आधार घेत आहेत." असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट भावनेचे प्रतिनितित्व करतात. ते राग, द्वेष, भीती आणि खोटेपणाचे प्रतिनिधित्व करतात,'' अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. यावेळी सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे नेहमीच उघडे असतील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

''कुठल्याही क्षेत्रातील, कुठल्याही विचारसरणीचे आणि कुठल्याही वयाच्या व्यक्ती आम्हाला भेटू शकतात. मी काँग्रेसशी संबंधित असलो तरी कुणासाठीही माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात,'' असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पैकी अमेठीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच आपल्या नव्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज वायनाड येथील कालपेट्टा येथे रोड शो केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा