शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:37 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ''नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खोटेपणाचा वापर केला. मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत,'' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. वायनाड येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. आज राष्ट्रीय पातळीवर आम्ही विषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द वापरतोय, असे तुम्हाला वाटत असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत. राग आणि द्वेषाचा वापर करून ते देशातील जनतेमध्ये फूट पाडत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी खोटेपणाचा आधार घेत आहेत." असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट भावनेचे प्रतिनितित्व करतात. ते राग, द्वेष, भीती आणि खोटेपणाचे प्रतिनिधित्व करतात,'' अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. यावेळी सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे नेहमीच उघडे असतील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

''कुठल्याही क्षेत्रातील, कुठल्याही विचारसरणीचे आणि कुठल्याही वयाच्या व्यक्ती आम्हाला भेटू शकतात. मी काँग्रेसशी संबंधित असलो तरी कुणासाठीही माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात,'' असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पैकी अमेठीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच आपल्या नव्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज वायनाड येथील कालपेट्टा येथे रोड शो केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा