शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 20:46 IST

Narendra Modi And Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. "गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिलं आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने शक्तिशाली भारतीय सैन्य, आपल्या गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला मी सलाम करतो" असं मोदींनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि सांगितलं की, "जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. भारताची दहशतवादाविरुद्धची मोहीम फक्त स्थगित करण्यात आली आहे. भविष्यात कठोर निर्णय घेतले जातील आणि त्याला प्रत्युत्तरही दिलं जाईल. न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल."

"आम्ही भारतीय सशस्त्र दलांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही. हे राष्ट्राच्या सामूहिक भावनेचं एक शक्तिशाली प्रतिक आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एकत्र उभा राहिला."

"सैन्याने प्रचंड शौर्य दाखवलं. आम्ही लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं होतं, म्हणून भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलं. भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कृतीने पाकिस्तान हादरला आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान