शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 20:46 IST

Narendra Modi And Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. "गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिलं आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने शक्तिशाली भारतीय सैन्य, आपल्या गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला मी सलाम करतो" असं मोदींनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि सांगितलं की, "जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. भारताची दहशतवादाविरुद्धची मोहीम फक्त स्थगित करण्यात आली आहे. भविष्यात कठोर निर्णय घेतले जातील आणि त्याला प्रत्युत्तरही दिलं जाईल. न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल."

"आम्ही भारतीय सशस्त्र दलांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही. हे राष्ट्राच्या सामूहिक भावनेचं एक शक्तिशाली प्रतिक आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एकत्र उभा राहिला."

"सैन्याने प्रचंड शौर्य दाखवलं. आम्ही लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं होतं, म्हणून भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलं. भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कृतीने पाकिस्तान हादरला आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान