शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:03 IST

Narendra Modi Speech in Rajya Sabha: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी (Narendra Modi) राज्यभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांमधील आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या सरकारला एक तृतियांश सरकार म्हटलं. हो, आमचं सरकार हे एक तृतियांश सरकार आहे. आमच्या सरकारची दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. सरकारची २० वर्षे अद्याप बाकी आहेत.

काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी राज्यभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पलटवार केला. मोदी म्हणाले की, ६० वर्षांनंतर देशात  कुठलंही सरकार हे तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना असामान्य आहे. काही लोक जाणून बुजून तोंड लपवून बसली आहे. त्यांना काही समजलं नाही. मात्र ज्यांना समजलं त्यांनी हुल्लडबाजी करून देशातील जनतेच्या विवेकबुद्धीसमोर अंधार आणण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोदी म्हणाले की, या निवडणुकीत देशवासियांनी दाखवलेल्या विवेकबुद्धीबाबत मला अभिमान वाटतो. कारण त्यांनी प्रोपेगेंडाला पराभूत केले. देशाच्या जनतेने कामगिरीला प्राधान्य दिलं. जनतेने विश्वासाच्या राजकारणावर मोहोर उमटवली आहे. राज्यघटनेला ७५ वर्षे झाली आहेत. राज्यसभेलाही ७५ वर्षे झाली आहेत. माझ्यासारखे अनेक लोक असे आहेत, ज्यांच्या कुटुंबातील लोकांनी गावचं सरपंचपदही भूषवलेलं नाही. मात्र आज महत्त्वपूर्ण पदांवर पोहोचून देशाची सेवा करत आहेत. त्याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आहे. माझ्यासारख्या अनेक जणांना त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी