शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

नरेंद्र मोदी, शहा यांनी नागरिकांची दिशाभूल केली - मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:33 IST

काँग्रेसचा शांती मोर्चा; स्थापना दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम

मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी रोजगार, नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच मोदी, शहा हे खोटारड्यांचे सरदार असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त शनिवारी सकाळी ‘देश वाचवा संविधान वाचवा’ शांती मार्च ऑगस्ट क्रांती मैदान येथील तेजपाल सभागृह ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ््यापर्यंत काढण्यात आला. ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारील गोकुळदास तेजपाल सभागृहात १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला ‘चले जाव’चा इशारा दिला. भाजपचे सरकार काहीतरी चांगले करण्याऐवजी संविधानाचे तुकडे करण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.तेजपाल सभागृह येथे खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आॅगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. विल्सन महाविद्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.खरगे म्हणाले, मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात याच मुंबईतून झाली. संविधानाच्या मार्गाने देशात लोकशाही रुजवली व वाढविण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाºया भाजपने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात धार्मिक फूट पाडून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना ‘चले जाव’ सांगण्यासाठी देश वाचवा संविधान वाचवा मोर्चा काढण्यात आल्याचे खरगे म्हणाले.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ.डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, आ. अमित देशमुख, वर्षा गायकवाड, भाई जगताप, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, खा. हुसेन दलवाई, कुमार केतकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सचिन सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीकाँग्रसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसने सर्व जातीधर्माच्या गरीब, श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी, न्याय व व्यक्तिस्वातंत्र्य दिले. संविधानाने जनतेला दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे.भाजप युवा मोर्चाचा सवालनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र त्याच आॅगस्ट क्रांती मैदानात निघालेल्या काँग्रेसचा रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली कशी? असा सवाल भाजप युवा मोर्चाने केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा