शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नरेंद्र मोदी, शहा यांनी नागरिकांची दिशाभूल केली - मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:33 IST

काँग्रेसचा शांती मोर्चा; स्थापना दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम

मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी रोजगार, नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच मोदी, शहा हे खोटारड्यांचे सरदार असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त शनिवारी सकाळी ‘देश वाचवा संविधान वाचवा’ शांती मार्च ऑगस्ट क्रांती मैदान येथील तेजपाल सभागृह ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ््यापर्यंत काढण्यात आला. ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारील गोकुळदास तेजपाल सभागृहात १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला ‘चले जाव’चा इशारा दिला. भाजपचे सरकार काहीतरी चांगले करण्याऐवजी संविधानाचे तुकडे करण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.तेजपाल सभागृह येथे खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आॅगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करून लोकशाही व संविधानविरोधी केंद्रातील भाजप सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. विल्सन महाविद्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.खरगे म्हणाले, मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाची सुरुवात याच मुंबईतून झाली. संविधानाच्या मार्गाने देशात लोकशाही रुजवली व वाढविण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाºया भाजपने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात धार्मिक फूट पाडून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना ‘चले जाव’ सांगण्यासाठी देश वाचवा संविधान वाचवा मोर्चा काढण्यात आल्याचे खरगे म्हणाले.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ.डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, आ. अमित देशमुख, वर्षा गायकवाड, भाई जगताप, प्रणिती शिंदे, अस्लम शेख, अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, खा. हुसेन दलवाई, कुमार केतकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सचिन सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीकाँग्रसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसने सर्व जातीधर्माच्या गरीब, श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान संधी, न्याय व व्यक्तिस्वातंत्र्य दिले. संविधानाने जनतेला दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे.भाजप युवा मोर्चाचा सवालनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र त्याच आॅगस्ट क्रांती मैदानात निघालेल्या काँग्रेसचा रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली कशी? असा सवाल भाजप युवा मोर्चाने केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा