शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:36 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात.

ठळक मुद्देट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतातजवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री उशीरा केलेल्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली. येत्या रविवारी सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करण्याचा मानस मोदींना केला आहे. मात्र अनेक मोदी चाहत्यांनी त्यांना हा निर्णय बदलवावा अशी मागणी करत आहेत. पण नेमकं नरेंद्र मोदीसोशल मीडियावरील अकाऊंट का बंद करतायेत? याबाबतच्या चर्चेंना उधाण आलं आहे. 

सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन सांगितले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकले नाही. पण नरेंद्र मोदींनी याप्रकारचं ट्विट केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण स्वत: नरेंद्र मोदीच याचं उत्तर देतील. मात्र काही शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे. 

स्वदेशी सोशल मीडिया येणार ?पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटनंतर ही शक्यता वर्तवली जात आहे. नरेंद्र मोदींनी नेहमी मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं आहे. अशात रविवारी भारत स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करु शकतो असं बोललं जातं आहे. त्यामुळे गुगलला टक्कर देण्यासाठी भारताचा गुटरगू नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येईल असं व्हायरल होत आहे. 

विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवणेसध्या परीक्षेचे दिवस सुरु असल्याने विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी असं सांगितले असावे अशीही चर्चा आहे. 

दिल्ली हिंसाचाराने व्यथितगेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी मोदी व्यथित आहेत. २६ फेब्रुवारीला त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अफवांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. 

समाजाला शिकवण त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृत्यातून लोकांपर्यंत संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावरील अकाऊंटमुळे लोकांनी एकमेकांना भेटणे बंद केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकांतपणा वाढत चालला असल्याने या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना एकत्रित येण्याबाबत शिकवण दिली असेल अशी चर्चाही लोकांमध्ये सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी

‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली

घटना घडून गेल्यावर आम्ही फारसे काही करू शकत नाही

फाशी ढकलली जाणे, हे व्यवस्थेचे अपयश, निर्णयावर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाdelhi violenceदिल्ली