शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये अराजकता माजेल', विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचे उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 16:13 IST

पीएम मोदींच्या तिसऱ्या टर्मबाबत सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांनी जोरदार पलटवार केला.

Narendra Modi Hoshangabad Rally: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, विरोधक सातत्याने, मोदी सरकारकडून देशाला धोका आहे. मोदी सरकार संविधान बदलणार, अशाप्रकारच्या टीका होतात. आता या सर्व टीकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. तसेच, विरोधकांना थेट सल्लाही दिला.

मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यावर आग लागेल, असे काँग्रेसवाले म्हणतात. 2014 आणि 2019 मध्येही ते अशाच प्रकारची टीका करायचे. पण, आतापर्यंत कधी देशात आग लागली का? राम मंदिराबाबतही ते हेच बोलायचे, पण यामुळे आग लागली का? आग देशात नाही, तर त्यांच्या मनात लागली आहे. ही ईर्षा त्यांच्या मनात इतकी तीव्र झाली आहे की, त्यांना आतून जाळत आहे. ही ईर्षा मोदींमुळे नाही, तर 140 कोटी नागरिकांच्या मोदींवरील प्रेमामुळे आहे. त्यांना हे प्रेमही सहन होत नाही, अशी टीका मोदींनी केली.

इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर म्हणाले...तुम्ही इंडिया आघाडीची स्थिती पाहा. जाहीरनामा एक जबाबदारी आहे, देशातील जनतेशी बांधिलकी आहे. त्यांना काय करायचे आहे, कसे करायचे? हेदेखील त्यांच्या बोलण्यात कुठेच दिसत नाही. त्यांच्या एका सहकाऱ्याने जाहीरनाम्यात म्हटले की, आम्ही देशातून अण्वस्त्रे नष्ट करू. कोणताही देश असा विचार करेल का? यावरुनच, ते देशाच्या हिताचा विचार करू शकतात का? असा प्रश्न पडतो. त्यांचा विचार जितका घातक आहे, तितकाच त्यांचा जाहीरनामाही धोकादायक आहे, असा घणाघात मोदींनी केली. 

घराणेशाहीच्या राजकारणावर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेसच्या एकाच कुटुंबाने थेट किंवा रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. या कुटुंबाने देशात आणीबाणी लागू केली. काँग्रेसने पत्त्याच्या घराप्रमाणे देशभरातील लोकशाही सरकारे पाडली. काँग्रेसने आपल्या इच्छेनुसार इतिहासाचे विकृतीकरण करुन हवे ते मिळवले. काँग्रेसचे मानायचे झाले तर, त्या काळात लोकशाही चांगली चालली होती आणि बहरत होती. मात्र गरीब कुटुंबातील मुलगा पंतप्रधान होताच काँग्रेसने संविधान आणि लोकशाही धोक्यात येईल, अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांना माहीत नसेल, पण बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी इथपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस