शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:18 IST

विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी उत्तर दिले. राज्यसभेत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहातून बाहेर पडणे हे त्यांचे भाग्य आहे. खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत. या लोकांना सत्य पचवता येत नाही. यामुळे ते सभागृह सोडून पळून जात आहेत. मी माझ्या कर्तव्याशी संलग्न आहे. मला प्रत्येक क्षणाचा हिशोब देशवासियांना द्यायचा आहे. तिसऱ्यांदा संधी मिळणे ऐतिहासिक आहे. खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. तसेच, गेल्या अडीच दिवसांत सुमारे ७० खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल मी तुम्हा सर्व खासदारांचे आभार मानतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील आपल्या संसदीय लोकशाही प्रवासात अनेक दशकांनंतर देशातील जनतेने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. ६० वर्षांनंतर असे झाले आहे की, सरकार १० वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा परतले आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. जनतेने दिलेल्या या निर्णयाला काही लोकांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "मला काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. निकाल आल्यापासून एका सहकाऱ्याकडून (जरी त्यांचा पक्ष त्यांना पाठिंबा देत नसला तरी) एक तृतीयांश सरकार स्थापन होईल, असे वारंवार सांगितले जात होते. १० वर्षे उलटून गेली आणि अजून २० बाकी आहेत यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते. एक तृतीयांश झाले, अजून दोन तृतीयांश बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीसाठी त्यांच्या तोंडात तूप आणि साखर."

आम्हाला मेहनत करायची आहे. येत्या पाच वर्षांत मूलभूत सुविधांच्या सॅच्युरेशनवर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्ध निर्णायक लढा देणार आहे. गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू. मी माझ्या १० वर्षांच्या अनुभवावरून बोलत आहे की, जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल. या काळात तुम्हाला विस्ताराच्या अनेक संधी मिळतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्ही शेतीकडे सर्वसमावेशकपणे पाहिले आहे आणि मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड देखील दिले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात १० वर्षातून एकदाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात होती आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. ६० हजार कोटींच्या कर्जमाफीबाबत एवढा गदारोळ झाला होता. त्याचे लाभार्थी फक्त तीन कोटी शेतकरी होते. गरीब शेतकऱ्याचा नाव सुद्धा नव्हते. त्यांना काही फायदाही होऊ शकला नाही."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपा