शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

'नरेंद्र मोदींना सातत्याने खलनायक ठरविणे चुकीचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 5:08 AM

' मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. '

नवी दिल्ली : मोदी सरकारला नेहमीच खलनायक ठरविणे, त्यांच्या सर्वच कारभाराबद्दल सतत नकारात्मक बोलणे योग्य नाही, या माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, शशी थरूर यांनी व्यक्त केलेल्या मतांना काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची उचित दखल न घेणे तसेच त्यांच्यावर सतत टीका करणे ही भूमिका विरोधी पक्षांना नेहमीच फायदेशीर ठरणार नाही, असे मत जयराम रमेश यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात गुरुवारी व्यक्त केले होते. त्यांच्या मताला पाठिंबा देत अभिषेक मनू सिंघवी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. कोणत्या हेतूने एखादी कृती करण्यात आली याचे बारकाईने निरीक्षण करून मगच त्याविषयी मत व्यक्त करायला हवे. केवळ व्यक्ती पाहून विरोध व्हायला लागला तर ते निरर्थक ठरेल.मोदींची भाषा मनाला भिडणारीप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत कसा फायदा झाला याचे विश्लेषण जयराम रमेश यांनी केले होते. २०१४ पासून पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती कामे केली की, ज्यामुळे ते पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आले याचा धांडोळा त्यांच्या टीकाकारांनी घ्यायला हवा. मोदी लोकांच्या मनाला भिडेल अशी भाषा वापरतात, असेही ते म्हणाले होते. जयराम रमेश यांच्या या मताशीही अभिषेक मनू सिंघवी यांनी सहमती दर्शविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी