शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

200 कोटींचं लग्न पोहचलं हायकोर्टात; उत्तराखंड सरकारला अहवाल देण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:32 PM

औली येथे हेलिपॅड बनविण्यासाठी किती झाडे कापली गेली? हेलिपॅड बनविले आहे का? औलीमध्ये लग्न करण्याची परवानगी दिली कोणी?

नैनीताल - उत्तराखंडच्या औली येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न होणार आहे. मात्र या लग्नाविरोधात नैनीताल कोर्टात याचिका दाखल झाली आहे. नैनीताल हायकोर्टाने याबाबत उत्तराखंड सरकारकडून उत्तर मागवलं आहे. कोर्टाने या प्रकरणाला गंभीरतेने घेऊन औली येथे लग्न करण्याची परवानगी गुप्ता बंधूंना कोणी दिली असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसेच आजच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने औली येथील लग्नस्थळाची पाहणी करावी आणि उद्यापर्यंत अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत. 

उत्तराखंड सरकारने आज दुपारी 2 पर्यंत याबाबत स्पष्टीकरण द्यावं. औली येथे हेलिपॅड बनविण्यासाठी किती झाडे कापली गेली? हेलिपॅड बनविले आहे का? औलीमध्ये लग्न करण्याची परवानगी दिली कोणी? असे प्रश्न मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन यांच्या खंडपीठाने उत्तराखंड सरकारला विचारले आहेत. तसेच कोर्टाने पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या गुप्ता बंधूंकडून पाच कोटी रुपये भरपाई केली आहे की नाही असंही विचारलं आहे. काशीपूरचे रहिवाशी रक्षित जोशी यांनी जनहित याचिका केली त्यावर नैनीताल हायकोर्टाने सुनावणी केली. 

गुप्ता बंधू कुटुंबासह औली येथे पोहचले असून उद्यापासून हा लग्नाचा कार्यक्रम सुरु होणार आहे. औली येथे 18 ते 22 जूनपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लग्नाच्या पूर्वसंध्येला 17 जूनरोजी आयोजकांकडून स्थानिक लोकांना भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील एनआरआय भारतीय उद्योजकाच्या मुलांची हाय-प्रोफाईल लग्न भारतातील उत्तराखंड येथील शानदार हिल स्टेशनजवळ होणार आहे. या लग्नासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचे लग्न 18-20 जून दरम्यान होईल तर त्यांच्या छोटे बंधू अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांकचं लग्न 20-22 जून दरम्यान होणार आहे. सूर्यकांत याचे लग्न हिरा व्यापाऱ्याच्या मुलीशी तर शशांकचे लग्न दुबईतील उद्योजकाच्या मुलीशी होणार आहे.

उत्तराखंडमधील हिल स्टेशन औली येथे गुप्ता कुटुंबीयातील मुलांची लग्न होणार आहे. या लग्नासाठी औली परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसोर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत. लग्नाच्या सजावटीसाठी लागणारी फुलं स्विर्झंलंडमधून 5 कोटी रुपयांना मागविण्यात आली आहेत. तसेच दिल्लीहून पाहुण्यांना औली येथे आणण्यासाठी जवळपास 200 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आली आहेत. या रॉयल लग्नासाठी 100 पंडितांचे बुकींग करण्यात आलं आहे. लग्नाची आमंत्रण पत्रिकाही चांदीपासून बनविण्यात आली असून त्याचं वजन साडेचार किलो आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील अजय गुप्ता, अतुल गुप्ता, राजेश गुप्ता यांनी दक्षिण आफ्रिकेत उद्योगाचा साम्राज्य उभं केलं आहे. 1993 च्या आधी गुप्ता कुटुंबीय सहारनपूर येथील रायवाला मार्केटमध्ये रेशनचं दुकान चालवत असे. 

टॅग्स :marriageलग्नHigh Courtउच्च न्यायालय