शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? 'या'नावांची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:01 IST

मणिपूर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधक सातत्याने एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह आता मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांबाबत भाजप लवकरच दिल्लीत निर्णय घेऊ शकते. गेल्या दीड वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे मणिपूर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधक सातत्याने एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांतच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरचे भाजप आमदार हे एन. बिरेन सिंह यांच्यावर नाराज होते. याबाबत केंद्रीय नेतृत्वाला माहिती होती. मणिपूर विधानसभेचे अधिवेशनही १० फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. भाजप आमदार स्वतः सभागृहात सरकारबाबत नाराजी व्यक्त करू शकतात, असे म्हटले जात होते. 

याचबरोबर, राज्यातील १२ भाजप आमदार नेतृत्व बदलाची मागणी करीत होते. त्यामुळे  एन. बिरेन सिंह यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली. सध्या भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते संबित पात्रा हे मणिपूरमध्ये आहेत. संबित पात्रा यांनी राज्यपाल अजय भल्ला यांचीही भेट घेतली आहे. मणिपूरमधील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी संबित पात्रा हे मणिपूरला गेल्याचे सांगितले जात आहे. 

मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्रिपदासाठी ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री युमनाम खेमचंद सिंह, कॅबिनेट मंत्री टी विश्वजित सिंह आणि विधानसभा अध्यक्ष टी सत्यव्रत यांची नावे आघाडीवर आहेत. दरम्यान, एन. बिरेन सिंह २०१७ पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे. असे असले तरी, गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा