शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी 'नीच माणूस', मी बरोबरच बोललो होतो; मणिशंकर पुन्हा अवतरले, काँग्रेसला अडकवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:05 IST

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'नीच प्रकारचा माणूस' असा आपण केलेला योग्यच होता, असे सांगणारा लेख अय्यर यांनी लिहिला आहे. मोदींनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत मी तेव्हा बरोबर भविष्यवाणी केली होती की नाही? असे अय्यर यांनी या लेखात म्हटले आहे. गुजरात निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख 'नीच प्रकारचा माणूस' असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाने या वक्तव्यावरून मणिशंकर अय्यर यांना धारेवर धरत ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसची कोंडी केली होती. त्यानंतर या वक्तव्यासाठी अय्यर यांना माफी मागावी लागली होती. तसेच काँग्रेसनेही अय्यर यांच्या वक्तव्यापासून अंतर राखले होते.  

 दरम्यान, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये मणिशंकर अय्यर यांनी त्यांनी 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यांचा हवाला देऊन मणिशंकर अय्यर या लेखात म्हणाले की, ''2017 मध्ये मी नरेंद्र मोदी यांना काय म्हटले होते हे आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती का?''  दरम्यान, काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानापासून स्वत:ला बाजूला करताना चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कारवाई करतात, असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादाचा स्तर घसरवला आहे, अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे.  मणिशंकर अय्यर यांनी आपल्या लेखातून पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदींनी राजीव गांधींच्या 1987मधील लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरही अय्यर यांनी टीका केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण