शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'माझा नवा भारत भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल', कपिल सिब्बलांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 15:24 IST

Kapil Sibbal On PM Modi: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पीएम मोदींच्या वक्तव्यावर सिब्बलांची टीका.

Kapil Sibbal On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.28) नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्या उद्घाटनावरुन विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यातच आता राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनावेळी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या आकांक्षेने आणि स्वातंत्र्याच्या विचारानेच ‘नवा भारत’ घडू शकतो.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या विकासाच्या प्रवासातील "अमर" क्षण असल्याचे वर्णन करताना, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी दावा केला की, ते आत्मनिर्भर आणि विकसित भारताची पहाट चिन्हांकित करेल, जे इतर देशांच्या विकासास प्रेरणा देईल. लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, नवीन संसद भवन "नवीन भारता"ची उंची गाठण्यासाठी काम करण्याचा संकल्प दर्शवतो.

उद्घाटन समारंभात पंतप्रधानांच्या वक्तव्याचा दाखला देत सिब्बल म्हणाले, "स्वातंत्र्याचा विचार हा माझा नवा भारत घडवू शकतो. फक्त वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या स्वातंत्र्याच्या विचारानेच नवीन भारत निर्माण होईल. यात नवनवीन कल्पनांना आकार मिळेल आणि सर्व प्रकारचे रंग विखउरले जातील. हा भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल...'' 

सिब्बल यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडलासंयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री असलेले सिब्बल यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडली. सिब्बल हे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी नुकतेच 'इन्साफ' नावाचे व्यासपीठ सुरू केले आहे. त्यांच्या मते अन्यायाविरुद्ध लढा हा या व्यासपीठाचा उद्देश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसParliamentसंसदBJPभाजपा