शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 50 मान्यवरांविरोधातील देशद्रोहाचा खटला बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 9:19 PM

नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींच्या विरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मुजफ्फरपूरः मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या एसएसपींनी या मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाचा खटला रद्द करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार नाही.  दुसरीकडे स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी दोन महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवरून मुख्य न्यायदंडाधिकारी(सीजेएम) सूर्यकांत तिवारींच्या आदेशानंतर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. ओझानं सांगितलं की, 20 ऑगस्ट रोजी मी याचिका दाखल केली, त्यानंतर मुजफ्फरपूर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलं. दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही, असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली होती. त्यानंतर त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 50 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे वातावरण न निवळता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे. तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली होती. तसेच जय श्रीराम हे आज भडकावणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारण बंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी