शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नान चुकलं, रेल्वेकडे मागितली ५० लाख रुपयांची भरपाई, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:18 IST

ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते.

उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावरगेल्या बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अनेक भाविकांनी अमृत स्नान केले. मात्र, याच पार्श्वभूमीवर  उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरमधून एक वेगळेच समोर आले आहे. येथील एका व्यक्तीने मौनी अमावस्येला अमृत स्नान करता आले नाही म्हणून रेल्वे प्रशासनाकडे ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.

राजन झा नावाच्या व्यक्तीने मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसी कोचची स्वतःसाठी आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांसाठी तिकिटे बुक केली होती, परंतु रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे त्यांना कोचपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे राजन झा यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसमवेत २७ जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त स्नान करण्यासाठी मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसीमध्ये तात्काळ तिकीट बुक केले होते. त्यांना एसी कोचच्या B3 मधील सीट क्रमांक ४५, ४६ आणि ४७ वर आल्या कुटुंबीयांसोबत प्रवास करायचा होता. 

ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते. राजन झा यांनी सांगितले की, ज्या ट्रेनमध्ये माझी सीट होती, त्या कोचचा दरवाजा आतून बंद होता. महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी स्टेशन खचाखच भरले होते. स्टेशनवर गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे आम्ही कोचपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली.

५० लाख रुपयांची भरपाईदरम्यान, याप्रकरणी राजन झा यांनी आपले वकील एसके झा यांच्यामार्फत रेल्वेकडून ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. या प्रकरणाची माहिती देताना वकील एसके झा म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे हे प्रकरण आहे, ज्यामध्ये रेल्वेचा निष्काळजीपणा दिसून येतो. राजन झा यांना कुटुंबासह अमृत स्नानासाठी जायचे होते, परंतु कोचचा दरवाजा उघडत नसल्यामुळे ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले नाहीत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजrailwayरेल्वे