शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नान चुकलं, रेल्वेकडे मागितली ५० लाख रुपयांची भरपाई, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:18 IST

ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते.

उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावरगेल्या बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अनेक भाविकांनी अमृत स्नान केले. मात्र, याच पार्श्वभूमीवर  उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरमधून एक वेगळेच समोर आले आहे. येथील एका व्यक्तीने मौनी अमावस्येला अमृत स्नान करता आले नाही म्हणून रेल्वे प्रशासनाकडे ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.

राजन झा नावाच्या व्यक्तीने मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसी कोचची स्वतःसाठी आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांसाठी तिकिटे बुक केली होती, परंतु रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे त्यांना कोचपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे राजन झा यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसमवेत २७ जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त स्नान करण्यासाठी मुझफ्फरपूरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसीमध्ये तात्काळ तिकीट बुक केले होते. त्यांना एसी कोचच्या B3 मधील सीट क्रमांक ४५, ४६ आणि ४७ वर आल्या कुटुंबीयांसोबत प्रवास करायचा होता. 

ट्रेन रात्री ९.३० वाजता निघणार होती, पण राजन झा हे आपल्या कुटुंबीयांसह अडीच तास आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर पोहोचले होते. राजन झा यांनी सांगितले की, ज्या ट्रेनमध्ये माझी सीट होती, त्या कोचचा दरवाजा आतून बंद होता. महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी स्टेशन खचाखच भरले होते. स्टेशनवर गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे आम्ही कोचपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली.

५० लाख रुपयांची भरपाईदरम्यान, याप्रकरणी राजन झा यांनी आपले वकील एसके झा यांच्यामार्फत रेल्वेकडून ५० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. या प्रकरणाची माहिती देताना वकील एसके झा म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे हे प्रकरण आहे, ज्यामध्ये रेल्वेचा निष्काळजीपणा दिसून येतो. राजन झा यांना कुटुंबासह अमृत स्नानासाठी जायचे होते, परंतु कोचचा दरवाजा उघडत नसल्यामुळे ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले नाहीत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजrailwayरेल्वे